तुम्हाला नवल वाटत असेल
तुमच्याशी जगातल्या भुकेबद्दल बोलायला
ओशियानियातली एक समुद्रजीवशास्त्रज्ञ
इथे का आली म्हणून.
मी आज इथे आले आहे, कारण
महासागरांचे रक्षण करण्याची गरज
पर्यावरणाच्या गरजेहून मोठी आहे.
आपण मच्छीमार उद्योग निर्माण करण्यासाठी
किंवा ते टिकवण्यासाठी जे करतो
त्यापेक्षा मोठी.
केवळ आर्थिक मागोवा घेण्याहून मोठी.
महासागरांचे रक्षण करून
जगाचे पोषण करता येईल.
कसं, ते दाखवायची मला संधी द्या.
आपल्या ग्रहावर एक अब्जवर भुकेलेले लोक आहे.
हे तुम्हाला ठाऊक आहेच.
ही समस्या आणखी मोठी होईल
अशी अपेक्षा आहे.
या शतकाच्या मध्यावर जेव्हा
जगाची लोकसंख्या नऊ ते दहा अब्ज होईल,
तेव्हा आपल्या अन्नसाठ्यांवर
अधिक मोठा ताण पडेल.
ही एक मोठी चिंता आहे.
विशेषतः आजची आपली स्थिती लक्षात घेतली तर.
आता आपल्याला ठाऊक आहे की
आपलं दरडोई पिकाऊ जमिनीचं प्रमाण
घसरू लागलेलं आहे.
प्रगत आणि प्रगतीशील,
दोन्ही प्रकारच्या देशांमध्ये.
आपलं वातावरण बदलत जाणार
हे आपल्याला ठाऊक आहे.
त्यानुसार, पावसाचं स्वरूप बदलत जाईल.
या भगव्या रंगात दिसताहेत
त्या जागा कोरड्या पडतील.
निळ्या जागा जास्त ओल्या होतील.
त्यामुळे आपली अन्नकोठारं असणाऱ्या
मध्य पश्चिम आणि युरोपात
दुष्काळ पडेल.
आणि इतर जागी पूर येतील.
त्यामुळे आपला भुकेचा प्रश्न
केवळ जमिनीच्या मदतीने सोडवणे
कठीण होत जाणार आहे.
म्हणूनच महासागर अधिक समृध्द व्हायला हवेत,
तरच ते आपल्याला
जास्तीत जास्त अन्न पुरवू शकतील.
महासागर आपल्यासाठी तेच करताहेत.
फार पूर्वीपासून.
भूतकाळापासून,
आपण महासागरांतून मिळवलेलं अन्न
वाढत गेल्याचं दिसतं.
ते तसंच वाढत जाणार असं वाटत होतं.
साधारण १९८० पर्यंत.
पण त्याचवेळी त्यात घसरण दिसू लागली.
तेलाची परिसीमा तुम्ही ऐकली आहे.
ही माशांची परिसीमा असावी.
नसावी, त्याविषयी नंतर बोलेन.
जगभरात आपण पकडलेल्या माशांच्या प्रमाणात
१८ टक्के घसरण झाली आहे.
ती १९८० नंतर.
आणि ती तशीच चालू आहे.
हा एक मोठा प्रश्न आहे.
ही लाल रेघ सतत खाली चालली आहे.
पण ती आपण परत वर चढवू शकतो.
आणि आज मी त्याविषयीच बोलणार आहे.
हा आलेख परत वर कसा चढवायचा
ते आपल्याला ठाऊक आहे.
माशांची परिसीमा इतकीच असायला हवी,
असं काही नाही.
आपण जर ठराविक ठिकाणी
काही साध्या गोष्टी केल्या,
तर आपण आपली मासेमारी सुधारू शकू.
आणि त्यातून लोकांना अन्न पुरवू शकू.
आधी मासे कुठे आहेत ते माहीत हवं.
तर, मासे कुठे आहेत ते आधी पाहू.
असं दिसतं, की मासे, सोयिस्करपणे,
बऱ्याच प्रमाणात आपल्या देशांच्या
किनारपट्ट्यांजवळ राहतात.
किनारी क्षेत्रात.
आणि या भागावर
तिथल्या देशांचा अंमल असतो.
आणि ते देश आपल्या किनाऱ्यावरची
आपली मच्छीमारकेंद्रं चालवू शकतात.
किनारी देशांची अधिकारक्षेत्रे
साधारण २०० सागरी मैल पर्यंत असतात.
त्यांच्या आर्थिक स्वामित्व क्षेत्रात.
तिथे त्यांचा अंमल असतो
ही एक चांगली गोष्ट आहे.
कारण, खुले सागर,
या नकाशावर गडद रंगात दाखवले आहेत ते,
त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे जास्त कठीण असत.
कारण ते आंतरराष्ट्रीय पातळीवर करावे लागते.
आंतरराष्ट्रीय करारांशी संबंध येतो.
हवामान बदल करार पाहिलात, तर
तुम्हाला ठाऊक असेल,
ही एक अत्यंत मंद
निराशाजनक आणि रटाळ प्रक्रिया आहे.
त्यामुळे राष्ट्रीय पातळीवर नियंत्रण
ही एक अतिशय चांगली गोष्ट आहे.
खुल्या सागराच्या तुलनेत
किनाऱ्याजवळ किती मासे आहेत?
इथे पहा, खुल्या सागरापेक्षा
सातपटीने जास्त मासे
किनारी भागात आहेत.
त्यामुळे तिकडे लक्ष केंद्रित करायला हवं.
कारण तिथे आपण खूप काही करू शकू.
आपली पुष्कळ मच्छीमारकेंद्रं सुधारू शकू.
या किनारी भागावर लक्ष केंद्रित करून.
पण किती देशांत काम करावं लागेल?
जगात साधारण ८० किनारी देश आहेत.
या सगळ्या देशांतली मासेमारी
सुधारावी लागणार आहे का?
अशा किती देशांवर
लक्ष केंद्रित करायला हवं?
हे लक्षात घ्यायला हवं, की
युरोपियन संघ
मासेमारी व्यवस्थित सांभाळतो.
त्यासाठी त्यांचं एक समान धोरण आहे.
तर आपल्याला चांगलं व्यवस्थापन आढळलं,
युरोपियन संघात आणि नऊ इतर देशांत
तर, यात एकूण मासेमारीचा किती भाग आला?
तर, युरोपियन संघ अधिक नऊ देश मिळून
जवळपास जगातल्या मासेमारीचा
दोन तृतीयांश भाग होतो.
युरोपियन संघ अधिक चोवीस देश धरले
तर हे प्रमाण वाढून नव्वद टक्के होतं.
म्हणजे जवळजवळ जगातली सगळीच मासेमारी.
तर, काही मोजक्याच ठिकाणी काम करून
आपण आपली मासेमारी सुधारू शकतो.
पण तिथे आपल्याला काय करावं लागेल?
अमेरिकेत आणि इतरत्र केल्या गेलेल्या
कामावरून असं आढळलं आहे, की
तीन महत्वाच्या गोष्टी
करायला हव्यात.
मासेमारी सुधारतील त्या तीन गोष्टी अशा:
आपण किती मासे पकडतो त्यावर
मर्यादा घालायला हवी.
निरुपयोगी मासेमारी घटवायला हवी.
निरुपयोगी म्हणजे चुकून पकडल्यामुळे
फुकटच मेलेले मासे.
तीन, माशांच्या वसाहतींचं रक्षण करायला हवं.
नर्सरीज आणि अंडी घालण्याच्या जागांचं.
वाढीसाठी आणि पुनरुत्पादनासाठी.
म्हणजे त्यांची संख्या परत वाढेल.
या तीन गोष्टी मासेमारी सुधारतील हे नक्की.
हे कसं समजलं?
हे समजलं कारण आपण हे
खूप ठिकाणी घडताना पाहिलं आहे.
या स्लाईडवर दिसते आहे
नॉर्वे देशातल्या हेरिंग माशांची संख्या.
१९५० पासून ती कोसळत चालली होती.
ती घसरत चालली होती.
मग नॉर्वेने मासेमारीवर मर्यादा घातली
तेव्हा काय घडलं?
मासेमारी सुधारली.
हे आणखी एक उदाहरण आहे.
हेही नॉर्वेतलंच.
नॉर्वेतल्या आर्क्टिक कॉड या माशाचं.
तोच प्रकार. मासेमारी कोसळते आहे.
त्यांनी कचऱ्यावर मर्यादा घातली.
कचरा म्हणजे चुकून पकडल्यामुळे
वाया जाऊन,
बोटीतून टाकून दिलेले मासे.
जेव्हा कचऱ्यावर मर्यादा घातली,
तेव्हा मासेमारी सुधारली.
हे फक्त नॉर्वेतच नव्हे.
हे जगभरच्या देशांत
वेळोवेळी घडताना दिसतं.
जेव्हा हे देश पावलं उचलतात
आणि दीर्घकालीन व्यवस्थापनाची धोरणं
अंमलात आणतात,
तेव्हा कोसळलेली मासेमारी
सुधारू लागते.
म्हणजे हे बरंच आशादायक आहे.
याचा जागतिक मासेमारीशी काय संबंध?
याचा अर्थ,
आपण जर घसरणारी मासेमारी घेऊन
ती सुधारू शकलो, तर
आपण ती
वार्षिक १०० दशलक्ष मेट्रिक टन करू शकू.
मासेमारीची परिसीमा
अजून गाठली गेली नव्हती तर.
अजून आपल्याला संधी आहे,
केवळ सुधारण्याचीच नव्हे,
तर जास्त मासे पकडण्याची.
आणि आताच्यापेक्षा
जास्त लोकांना अन्न पुरवण्याची.
म्हणजे नेमके किती जास्त लोक?
सध्या आपण ४५० दशलक्ष लोकांना
दिवसातून एकवेळ
मासे देऊ शकतो.
हे सध्याच्या जागतिक मासेमारीवर आधारित आहे.
आणि अर्थातच, ती घसरते आहे
ती आपण सुधारली नाही तर,
हे प्रमाणही घसरणार.
पण मी सांगितलेल्या धोरणांसारखी
मासेमारी व्यवस्थापन धोरणं जर
१० ते २५ देशांत राबवली,
तर आपण हे प्रमाण सुधारू शकू
आणि ७०० दशलक्ष लोकांना वर्षभर
रोज मासे देऊ शकू.
साहजिकच, हे आपण करायला हवं,
कारण जगातला भुकेचा प्रश्न सोडवणं
ही गोष्ट चांगलीच आहे.
शिवाय ते किफायतशीर आहे.
मासे हे जगातलं सर्वात स्वस्त प्रथिन आहे.
असं आढळून आलं आहे.
गुंतवलेल्या दर डॉलरमागे मिळणारं
माशांचं प्रथिन पहा.
त्याची तुलना इतर प्राण्यांपासून मिळणाऱ्या
प्रथिनाशी करा
नक्कीच, मासेमारी फायदेशीर आहे.
तिला फारशी जमीन लागत नाही.
इतर प्राणी पाळण्याइतकी.
जमीन तर आधीच अपुरी पडते आहे.
आणि त्यासाठी फारसं गोडं पाणी लागत नाही.
इतर प्राण्यांपेक्षा
खूपच कमी गोडं पाणी.
कारण, या प्राण्यांना
अन्न पुरवणाऱ्या कुरणांना
गोडं पाणी लागतं.
मासेमारीची कार्बन पाऊलखूण फार कमी आहे.
थोडी कार्बन पाऊलखूण आहे. कारण
मासे पकडायला तिथे जावं लागतं.
त्यासाठी थोडं इंधन लागतं.
शेतीलाही कार्बन पाउलखूण असते.
मासेमारीची त्याहून खूप कमी
आणि कमी प्रदूषण करणारी असते.
मासे हा आपल्या आहाराचा भाग तर आहेच,
पण तो आणखी मोठा भाग होऊ शकतो.
ही गोष्ट चांगलीच आहे,
कारण ते पौष्टिक आहेत.
ते कर्करोग, हृदयविकार
आणि अतिस्थूलतेचा धोका कमी करतात.
खरं तर,
आमचे मुख्य कार्यकारी अधिकारी,
एंडी शार्पलेस,
या कल्पनेचे जनक,
म्हणतात,
मासे हे परिपूर्ण प्रथिन आहे.
ते असंही म्हणतात, की
आपली महासागर बचाव मोहीम
ही जमीन बचाव मोहिमेपेक्षा
मोठी झाली आहे.
आणि जमीन वाचवतानाही,
जैविक विविधता आणि अन्ननिर्मिती
एकमेकांच्या विरोधात जाण्याचा
प्रश्न उद्भवतोच.
जैविक विविधतेने विपुल अशी जंगलं पाडूनच
शेतजमीन मिळवावी लागते.
मगच त्यावर मका पिकवून
लोकांना अन्न देता येतं.
तिथे कायमच ही चढाओढ असते.
तिथे नेहमीच
एक कठीण निर्णय घ्यावा लागतो.
दोन फार महत्त्वाच्या
गोष्टीमधल्या निवडीचा.
जैविक विविधता टिकवणे किंवा
लोकांना अन्न पुरवणे.
पण महासागरात हा झगडा नसतो.
तिथे जैविक विविधता
आणि अन्नाची मुबलकता
हे विरोधी नसतात.
ते एकाच ओळीत उभे असतात.
तिथे जेव्हा आपण जैविक विविधता वाढवतो,
तेव्हा आपल्याला जास्त अन्न मिळतं.
लोकांना अन्न पुरवण्यासाठी
ते महत्त्वाचं आहे.
आता, यात एक "घोळ" आहे.
"घोळ" कळलं का?
(हास्य)
बेकायदा मासेमारी.
बेकायदा मासेमारीमुळे
मी म्हणत होते ते
दीर्घकालीन व्यवस्थापन गडबडतं.
बेकायदा मासेमारी म्हणजे
बंदी असलेली यंत्रं वापरणे
किंवा परवानगी नसलेल्या ठिकाणी मासे पकडणे.
किंवा चुकीचा आकार
वा प्रकाराचे मासे पकडणे.
बेकायदा मासेमारी फसवणूक करते,
ग्राहकांची आणि प्रामाणिक मच्छीमारांचीही.
ती थांबलीच पाहिजे.
बेकायदा मासे बाजारात
फसवेविरीने विकले जातात.
हे तुम्ही ऐकलं असेल.
खऱ्या नावापेक्षा वेगळ्याच नावाने.
गेल्या वेळी कोणते मासे खाल्लेत?
आठवतंय?
तोच तो मासा होता
याची खात्री आहे का?
आम्ही १३०० नमुने तपासले.
आणि साधारणपणे,
त्यातले एक तृतीयांश मासे
त्यांना दिलेल्या नावांचे नव्हतेच.
दहा स्नैपर माशांपैकी
नऊ हे स्नैपर नव्हतेच.
आमच्या चाचणीपैकी ५९ टक्के ट्युना माशांना
ते नाव देणं चुकीचं होतं.
रेड स्नैपर माशांचे १२० नमुने तपासले.
त्यातले फक्त ७ खरोखरचे रेड स्नैपर होते.
तुम्ही जर रेड स्नैपर शोधत असाल तर..
तुम्हाला शुभेच्छा!
मासे वितरण व्यवस्था ही खरोखर किचकट असते.
आणि तिच्या प्रत्येक पायरीवर
फसगत होण्याची शक्यता असते.
आपण तिचा पाठपुरावा करू शकलो नाही तर.
पाठपुरावा करणे म्हणजे
मासेमारी उद्योगाने
बोटीतून प्लेटीत जाईपर्यंत
माशांचा माग ठेवणे.
ग्राहकांना त्यांचे मासे कुठून आले
हे समजू शकेल याची खात्री देणे.
ही एक अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे.
हे घडतंय
पण ते अपुरं आहे.
म्हणून आम्ही सरकारकडे मागतोय
सुरक्षित सागरी अन्न कायदा
आज एका विनंती अर्जाची घोषणा करताना मला
आनंद होत आहे.
४५० व्यावसायिक आचाऱ्यानी
यावर सह्या केल्या आहेत.
हा अर्ज सरकारला विनंती करतो,
सुरक्षित सागरी अन्न कायद्याची
यात अनेक नामांकित आचारी आहेत.
ऐंथनी बोर्डेन, मारिओ बटाली,
बार्टन सीवर आणि इतर.
त्यांनी सह्या केल्या, कारण
त्यांना असं वाटतंय, की
लोकांना आपण काय खातोय
हे जाणून घेण्याचा हक्क आहे.
(टाळ्या)
मच्छीमारांनाही हे आवडतंय. तर
ह्या कायद्यासाठी
पाठिंबा मिळू शकेल.
आणि हे अगदी योग्य वेळी घडतंय.
कारण या मार्गाने आपण
फसवेगिरी थांबवू शकतो.
बेकायदा मासेमारीला आळा घालू शकतो.
यामुळे खबरदारी घेता येईल, की
मासेमारीच्या मर्यादा,
वसाहतींचं रक्षण, निरूपयोगी मासेमारीत घट
यांचा नीट उपयोग होतोय.
आपण आपली मासेमारी नीट चालवू शकतो
आपण कोट्यवधी लोकांसाठी
असं पौष्टिक अन्न निर्माण करू शकतो,
की ज्यासाठी
जमीन किंवा फारसं पाणी लागणार नाही.
ज्याची कार्बन पाऊलखूण कमी असेल,
आणि जे फायदेशीर असेल.
महासागरांचं रक्षण केल्याने
आपण जगाला अन्न पुरवू शकतो,
आणि आपल्याला आत्ताच सुरुवात केली पाहिजे.
(टाळ्या)
धन्यवाद. (टाळ्या)