कधी कधी शिकण्याची उत्तम संधी
ते क्षण असतात जेव्हा आपण गोंधळात असतो.
असे क्षण जेव्हा आपण विचार करायला
सुरुवात करतो आणि आपल्या प्रश्न पडतात
इतिहासात असे क्षण बऱ्याच वेळा आलेले आहे
आणि त्यातनं काही विस्मयकारक शोध लागलेत.
हीच गोष्ट बघा ना
एकदा आर्किमिडीज नावाचा एक व्यक्ती होता.
त्याचा जन्म २८७ इ. स. पू. मध्ये
सेरेकिस इथे झाला होता
तो ग्रीक गणितज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ, अभियंता
संशोधक व खगोलशास्त्रज्ञ होता.
एके दिवशी आर्किमिडीज ला सिसिलीच्या
राजा ने एक काम दिले
सोनाराने राजा ला फसवले आहे का
ह्याचा शोध लावण्याचे
राजा ने सांगितले की त्याने सोनारला
नेमके तितकेच सोने दिले होते
जितके मुकुट बनवण्यासाठी गरजेचे होते.
पण, जेव्हा मुकुट तयार झाला तेव्हा राजाला
असे वाटले की सोनाराने आपल्याला फसवून
मुकुटात थोडे चांदी वापरले आहे
आणि तितकेच सोने स्वतः कडे ठेवले आहे .
राजाने आर्किमिडीजला ही
समस्या सोडवायला सांगीतले.
पण राजाची एक अट होती :
त्याने मुकुटाचे काहीच नुकसान करायचे नाही.
ऐके दिवशी आंघोळ करताना
आर्किमिडीजच्या लक्षात आले की
आंघोळीच्या टबमधील पाण्याचीपातळी वाढते
आणि नंतर पाणी ओतू जातं
जसजसा तो पाण्यात बुडतो
अचानक त्याचं लक्षात आले की
पाण्याची पातळी किती वाढेल हे
त्याचं शरीराचा किती भाग पाण्याखाली आहे
ह्या वर अवलंबून होत.
हा शोध लागल्या वर त्याला इतका आनंद झाला की
तो लगेच टब बाहेर पडला
आणि "युरेका" म्हणत गल्लीत तसाच पळत सुटला!
प्राचीन ग्रीक भाषेत युरेकाचा
अर्थ आहे "मला सापडले".
त्याला काय सापडले होते?
खरेतर त्याला राजाची समस्या
सोडवायचे मार्ग सापडले होते
हे बघा, आर्किमिडीजला बघायचं होत की
मुकुटाची घनता
ही शुद्ध सोन्याचे घनते इतकीच होती कि नाही.
घनता मोजण्यासाठी एका वस्तूच्या वजनाला
त्याच्या घनफळ ह्याने भागाकार करावे लागते
शुद्ध सोन्याची घनता ही
चांदीच्या घनते पेक्षा जास्त असते.
म्हणजेच जर का मुकुटात चांदी असेल तर
त्याची घनता शुद्ध सोन्या पेक्षा कमी असेल.
मुकुट काश्यानेही बनवलेले असले
तरीही त्याचा आकार तोच राहील
म्हणजेच त्याचे घनफळ तेच राहील.
म्हणून जर का आर्किमिडीजला
पहिले मुकुटाचे पहिले मोजता आले
आणि नंतर त्याचे घनफळ मोजता आले
तर त्याला मुकुटाची घनता काढता येईल.
पण मुकुटाचे घनफळ काढणे सोपे नव्हते
कारण त्याचे आकार अनियमित होते
जे एका साध्या डब्ब्यापेक्षा
किंवा चेंडूपेक्षा वेगळे होते
म्हणून आकार मोजण्यासाठी त्याची लांबीरुंदी
मोजून त्यांचा गुणाकार करून चालणार नव्हते
मग आर्किमिडीजच्या लक्षात आले की
ह्याचे उत्तर होते
मुकुटाला आंघोळ घालणे.
मुकुटाला पाण्यात बुडवून पाण्याची किती
पातळी वाढते हे बघितलं
की मुकुटाचे घनफळ मोजता येईल,
आणि त्यावरून तो मुकुटाची घनता काढू शकेल.
जर मुकुटाची घनता हि
शुद्ध सोन्या पेक्षा कमी असेल तर
सोनार ने नक्कीच राजाला फसवले!
जेव्हा आर्किमिडीज राजा कडे परत गेला
आणि त्याने ही चाचणी करून बघितली
तेव्हा गोष्टीनुसार सोनाराने
खरच राजाला फसवले होते,
आणि थोडे चांदी घातले होते. म्हणूनच आजकाल
पाण्याची किती पातळी वाढते त्यानुसार
त्याचे घनफळ मोजण्याच्या पद्धतीला
आर्किमिडीजचा सिद्धांत असे म्हणतात.
पुढच्या वेळेस तुम्ही जेव्हा आंघोळ करताना
आर्किमिडीजचा सिद्धांत खरोखर बघणार,
तेव्हा कदाचित तुम्हालाही
काहीतरी नवीन युक्ती सुचेल.