मी बराच काळ शिकवते आहे,
आणि शिकवता-शिकवता
मुले व शिक्षण यांबद्दल बरीच माहिती गोळा केली आहे
आणि विद्यार्थ्यांच्यातील क्षमतेविषयी ही माहिती मला
खरोखरच अनेक लोकांना कळावी असे वाटते.
१९३१ मध्ये, माझी आज्जी --
तुम्हा लोकांसाठी डावीकडे खालच्या ओळीतील --
आठव्या इयत्तेतून पास झाली.
ती माहिती मिळविण्यासाठी शाळेत गेली
कारण सर्व माहिती तेथेच असायची.
ती माहिती पुस्तकांत होती, शिक्षकांच्या डोक्यात होती,
आणि माहिती मिळविण्यासाठी तेथे जाणे तिला भाग होते,
कारण शिकण्याची पद्धतच तशी होती.
आता लगेच पुढच्या पिढीत चला:
हे आहे एका खोलीचे विद्यालय, ओक ग्रोव्ह,
जेथे माझे वडील जात असत.
आणि त्यांनाही शाळेला जायला लागत होते
शिक्षकांकडून माहिती घेऊन आपल्या डोक्यात साठवण्यासाठी,
कारण सगळीकडे घेऊन जाण्यासारखे ते एकच स्मृतीयंत्र त्यांच्याकडे होते,
आणि आपल्याबरोबर सगळीकडे नेण्यासाठी,
कारण माहिती अशीच शिक्षकांकडून विद्यार्थ्यांकडे जात होती
आणि मग जगात वापरली जायची.
मी जेव्हा लहान होते,
आमच्या घरात विश्वकोशांचा संच होता.
मी जन्मले त्या वर्षीच तो खरेदी केला होता,
आणि ती परिस्थिती असामान्य होती,
कारण मला माहिती मिळविण्यासाठी ग्रंथालयात जायची गरज राहिली नव्हती;
माहिती माझ्या घरातच होती
आणि ती खरोखरच महान होती.
हे थोडे आधीच्या
दोन पिढ्यांच्या अनुभवांपेक्षा वेगळे होते,
आणि त्यामुळे माहिती घेण्या-देण्याची पद्धती अगदी छोट्या प्रमाणात का होईना
पण बदलली.
पण माहिती माझ्यापासून जवळ होती.
आणि मला नित्य वापरता येऊ शकत होती.
आणि मी शाळेतील विद्यार्थिनी असल्यापासून ते
मी शाळेत शिकवण्यास
सुरू करण्यामधील काळात,
आपल्याला इंटरनेटचा उदय होऊन प्रभाव वाढलेला दिसेल.
अगदी ज्यावेळी इंटरनेट
शैक्षणिक साधन म्हणून वापरण्यास सुरुवात झाली,
मी विस्काँसीन मधून निघाले
आणि कँसासला, छोटेसे गाव असलेल्या कँसासला पोचले,
जेथे एका छोट्या गावातील
छानश्या ग्रामीण शालेय परगण्यात
ग्रामीण शालेय परगण्यात,
तिथे मी शिकवत होते माझा आवडता विषय,
अमेरिकेची सरकारपद्धती.
माझे पहिलेच वर्ष -- अतिशय उत्साहात -- अमेरिकेच्या राज्यपद्धती बद्दल शिकवणार होते,
राजकारण मला फार आवडायचे.
१२ व्या इयत्तेतील मुले:
अमेरिकेच्या राज्यपद्धतीबद्दल
उत्साही होती असे म्हणता येणार नाही.
वर्ष दुसरे: थोड्या गोष्टी समजल्या -- खेळी बदलावी लागली.
आणि मी त्यांच्या समोर ठेवला खरोखरचा अनुभव
ज्यामुळे त्यांच्या त्यांनाच शिकण्यास वाव मिळाला.
मी त्यांना काय करा किंवा कसे करा काहीही सांगितले नाही.
त्यांच्यासमोर एक मुद्दा उपस्थित केला,
त्यांच्या समाजासाठी निवडणूक आघाडी तयार करण्यासंबंधी.
त्यांनी पत्रके काढली, विविध कचेऱ्यांत चौकशा केल्या,
वेळापत्रके तपासली, सचिवांशी गाठीभेटी केल्या,
आपल्या उमेदवारांची माहिती सगळ्या गावकऱ्यांना मिळावी
म्हणून एक निवडणूक आघाडी पुस्तिका काढली.
सरकार, राजकारण यांविषयी
आणि रस्ते व्यवस्थित बांधले आहेत की नाहीत
याबद्दल चर्चा करण्यासाठी
एका संध्याकाळी सर्वांना शाळेत बोलावले,
आणि त्यांना खरोखरच्या अनुभवातून अढळ शिक्षण मिळाले.
मोठे शिक्षक -- जास्त अनुभवी --
माझ्याकडे बघून म्हणाले,
"हां. ती पाहा, काय गोड आहे ना. ती काहीतरी (वेगळे) करवून घ्यायचा प्रयत्न करत आहे."
(हशा)
"पण तिला माहिती नाही ती कशात पडली आहे."
पण मला माहिती होते मुले नक्कीच येतील.
आणि मला तसा विश्वास होता.
आणि प्रत्येक आठवड्यात मी त्यांना मला त्यांच्याकडून काय हवे आहे ते सांगितले.
आणि त्या रात्री , सर्व ९० मुले --
-- व्यवस्थित कपडे घालून, जबाबदारी घेऊन आपली कामे करत होती.
मला फक्त बसून पाहायचे होते.
तो (कार्यक्रम) त्यांचा होता. तो एक अनुभव होता. खराखुरा.
तो त्यांच्यासाठी महत्त्वाचा होता.
आणि ती नक्कीच एक पायरी पुढे जातील.
कँसासमधून मी ऍरिझोनाला गेले,
तेथे फ्लॅगस्टाफला मी बरीच वर्षे शिकवले,
यावेळी माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना.
सुदैवाने यावेळी अमेरिकेची राज्यपद्धती शिकवायची नव्हती.
येथे भूगोलासारखा विषय शिकवू शकत होते.
परत, शिकण्यात थरार अनुभवला.
पण येथली एक गोष्ट वेगळी होती
ऍरिझानातील या कामाविषयीची,
मला शिकवायचे होते एका विविध
स्तरांतून, वर्गातून आलेल्या मुलांच्या गटाला
एका खऱ्याखुऱ्या सार्वजनिक शाळेत.
आणि असे काही प्रसंग घडायचे ज्यावेळेस आम्हाला अशा संधी मिळत असत.
आणि अशीच एक संधी
मिळाली पॉल रुसेसाबागिना यांना जाऊन भेटण्याची,
हे तेच सदगृहस्थ आहेत
ज्यांच्यावर "हॉटेल रवांडा" चित्रपट काढला आहे.
आणि ते आमच्या शेजारच्या शाळेत भाषण देणार होते.
आम्हाला चालत जाता येवू शकत होते; बसचेही पैसे लागणार नव्हते.
कोणताही खर्च नव्हता. एक परिपूर्ण सहल.
पण प्रश्न असा होता की
तुम्ही सातवी आणि आठवीच्या मुलांना वंशहत्येबद्दलच्या भाषणाला कसे न्यायचे
आणि तो विषय जबाबदारीने आणि आदराने
कसा त्यांच्यासमोर मांडायचा,
ज्यामुळे त्यांना त्याबद्दल कसे वागायचे ते कळेल.
आणि म्हणून आम्ही पॉल रुसेसाबागिना यांच्याकडे
अशा एका सदगृहस्थाचे उदाहरण म्हणून पाहिले
ज्यांनी स्वकर्तृत्वाने आपले आयुष्य काहीतरी चांगले करण्यासाठी वापरले आहे.
मग मी मुलांना आव्हान दिले, त्यांच्या
त्यांच्या आयुष्यातील अशी कोणत्याही व्यक्तीची किंवा त्यांची स्वतःची गोष्ट,
त्यांच्या जगातील अशी घटना शोधण्याबाबत ज्यात असे घडले आहे.
मी त्यांना याबाबत एक छोटासा माहितीपट तयार करायला सांगितला.
असे आम्ही पहिल्यांदाच करत होतो.
कोणालाच संगणकावर छोट्या चलचित्रीका तयार करण्याबद्दल माहिती नव्हती.
पण त्यांनी मनापासून काम केले. मग मी त्यांना त्यांच्या स्वतःच्या आवाजात माहितीपटात वर्णन घालण्यास सांगितले.
आणि त्यातून एक मोठी महत्त्वाची गोष्ट उघड झाली की
तुम्ही जेव्हा मुलांना त्यांचा स्वतःचा आवाज वापरण्यास सांगता,
आणि त्यांचे विचार त्यांना मांडू देता,
तेव्हा काय काय अचाट गोष्टी ती सांगतात.
या अभ्यासाचा शेवटचा प्रश्न आहे:
तुम्ही तुमचे आयुष्य लोकांच्या भल्यासाठी कसे
वापरू इच्छिता?
तुम्ही असे विचारल्यावर आणि वेळ देऊन ऐकल्यावर
मुले ज्या काही गोष्टी बोलतात
त्या केवळ असाधारण असतात.
चला पुढे जाऊया पेनसिल्वानियाला, जेथे मी हल्ली असते.
मी सायन्स लिडरशीप ऍकॅडमी येथे शिकवते,
जी फ्रँकलिन इंस्टीट्युट आणि फिलाडेल्फियातील शालेय विभाग यांच्यातील
सहकारामधून तयार झाली आहे.
आमची शाळा नववी ते बारावी पर्यंतची आहे,
पण आम्ही शाळा वेगळ्या पद्धतीने चालवतो.
मी तेथे गेले मुख्यतः
तेथील त्या शैक्षणिक पर्यावरणाचा भाग होण्यासाठी
जेथे मला माहिती असलेल्या मुलांच्या शिकण्याच्या पद्धतीला योग्य मानले जात होते,
आणि जेथे याचा खरोखरीचा तपास केला जात होता की
जर आपण माझी आज्जी शाळेत जात होती
आणि माझे वडील शाळेत जात होते किंवा मीही शाळेत जात होते त्यावेळच्या
माहितीच्या दुष्काळातील जुनी शैक्षणिक विचारसरणी
टाकून देण्यास तयार झालो,
तर माहितीच्या महापुराच्या या क्षणी,
काय काय करणे शक्य आहे.
जर माहिती सर्वत्र उपलब्ध असेल तर तुम्ही काय कराल?
तुम्हाला मुलांना शाळेत का बोलवावे लागतेय
जर त्यांना माहिती मिळवण्यासाठी तेथे येण्याची आता गरज राहिली नाही आहे?
फिलाडेल्फियामध्ये प्रत्येकासाठी लॅपटॉपची योजना आहे,
मग मुले लॅपटॉप दररोज त्यांच्याबरोबर आणतात,
घरी घेऊन जातात, आणि माहिती मिळवतात.
आणि जेव्हा तुम्ही विद्यार्थ्यांना
माहिती मिळविण्यासाठी साधने देता
तेव्हा एका गोष्टीसाठी तुम्हाला तयार असावे लागेल,
तुम्हाला हे समजून घ्यावे लागेल की
मुलांनी अपयशी होणे हा
ज्ञानार्जनाच्या या नवीन पद्धतीचा एक साधारण भागच आहे.
साधारण बहुपर्यायी चाचणीतील
एकाच अचूक उत्तराला रेखांकित करण्याच्या
संस्कृतीच्या खूळाला
सध्या शैक्षणिक क्षेत्रात आपण तोंड देतो आहे,
आणि मी येथे तुम्हाला सांगू इच्छिते की,
ते म्हणजे शिक्षण नव्हेच.
तुम्ही कधीही चूक करुच नये,
असे मुलांना सांगणे पूर्णपणे चुकीचे आहे.
म्हणून त्यांच्याकडून प्रत्येक वेळी बरोबर उत्तराचीच अपेक्षा केली तर
त्यांना शिकणे शक्यच होणार नाही.
आम्ही एक प्रकल्प केला,
आणि त्यातून आलेलीच ही एक कृती आहे
अपयशाविषयी असलेल्या आपल्या कल्पनांमुळे
मी जवळजवळ कधीच त्या कृती (कुणासमोर) भाव खाण्याच्या उद्देशाने सादर करत नाही.
तेलगळतीवर आधारित हा प्रकल्प
आम्ही वर्ष अखेरीस करायचा असे ठरवले होते
त्यातूनच माझ्या विद्यार्थ्यांनी ही माहितीचित्रे तयार केली.
मी त्यांना सांगितले विविध सार्वजनिक माध्यमांमध्ये अस्तित्वात असलेली
जी अनेक माहितीचित्रे आहेत
ती उदाहरण म्हणून घ्या,
त्यातील महत्त्वाच्या भागांचे निरीक्षण करा,
आणि अमेरिकेच्या इतिहासातील इतर
मनुष्यकृत दुर्घटनांची तशीच माहितीचित्रे स्वतः बनवा.
आणि त्यांना काही विशिष्ट नियमांनुसार ते करायचे होते.
ते सुरुवातीला याबद्दल थोडे अस्वस्थ होते,
कारण आम्ही असे पुर्वी कधीच केले नव्हते, आणि हे व्यवस्थित कसे करायचे ते त्यांना माहिती नव्हते.
त्यांना बोलता येते -- एकदम सफाईदारपणे,
आणि ते अत्यंत उत्कृष्ट लिहूही शकतात,
पण त्यांना त्यांच्या कल्पना वेगळ्या पद्धतीने सादर करायला सांगितल्यावर
थोडे त्रासदायक वाटले.
पण मी त्यांना काहीतरी करून ते करण्याची मोकळीक दिली.
जा समजावून घ्या. जा तयार करा.
पाहूया आपल्याला काय करता येते ते.
आणि नेहेमी चांगली चित्रे काढणाऱ्या विद्यार्थ्याने
यावेळीही निराशा केली नाही.
हे दोन-तीन दिवसात केले होते.
आणि ही कृती होती अशा विद्यार्थ्याची जो नेहमी असे करायचा.
आणि जेव्हा मी विद्यार्थ्यांना बसवले आणि म्हटले, "सगळ्यात चांगले कुणाचे आहे?"
आणि ते लगेचच म्हणाले, "ते पाहा तेथे."
काही वाचले नाही आणि म्हणे "ते पाहा तेथे."
मग मी म्हणाले, "ते सर्वात चांगले का आहे?"
ते म्हणाले, "अं.., रचना चांगली आहे, आणि त्याने चांगला रंग वापरला आहे
आणि थोडे ... ". आणि आम्ही मोठ्याने त्यावर चर्चा केली
मग मी म्हटले, "जा, ते वाचून या."
मग ते म्हणाले की, "हं, ते तेवढे खास नाही आहे."
मग आम्ही दुसऱ्या माहितीचित्राकडे गेलो --
त्यात चांगलीशी चित्रे नव्हती, पण माहिती मात्र अप्रतिम होती --
मग आम्ही या शिक्षणाच्या पद्धतीवर बोलण्यात एक तास घालवला,
कारण ती पद्धती केलेली गोष्ट सर्वोत्तम आहे का नाही याबद्दलची नव्हती,
किंवा मी काय करू शकतो वा शकत नाही याबद्दलही नव्हती;
या पद्धतीनुसार त्यांनी करून पाहायचे होते.
आणि तसे करताना त्यांना अपयशाला ,
आणि त्यातून शिकायला मुभा होती.
आणि यावर्षी परत आम्ही याची फेरी घेऊ,
यावेळी ते मागच्या वेळेपेक्षा चांगले करतील.
कारण शिक्षणात
काही प्रमाणात अपयशाची गरज आहे,
कारण या पद्धतीत
अपयश हे सूचनात्मक असते.
येथे टिचकी मारून दाखवण्याजोगी
लाखो चित्रे आहेत,
आणि काळजीपूर्वक निवडले -- हे मला आवडलेल्यांपैकी एक --
मुले शिकत असतानाचे,
माहिती मिळविण्यासाठी मुलांना शाळेत यावे लागते
या कल्पनेला तिलांजली दिल्यानंतरच्या दृश्यात
शिक्षण कसे असू शकते हे दाखवणारे,
पण त्या ऐवजी त्यांना माहिती कशी वापरणार हे विचारा.
त्यांना काही आवडीचे प्रश्न विचारा.
ते निराश करणार नाहीत.
त्यांना विविध ठिकाणी जाण्यास सांगा,
त्यांच्या त्यांना गोष्टी पाहू द्या,
त्यांना प्रत्यक्षात शिकण्याचा, खेळण्याचा,
आणि प्रश्न विचारण्याचा अनुभव द्या
हा माझ्या आवडीचा एक फोटो आहे,
कारण हा मंगळवारी घेतला होता,
जेव्हा मी विद्यार्थ्यांना मतदानासाठी जाण्यास सांगितले.
हा रॉबी आहे, आणि हा त्याचा मतदानाचा पहिला दिवस होता,
आणि त्याला मतदान सर्वांना सांगून करायचे होते.
पण हेही शिक्षणच आहे,
कारण आम्ही त्यांना खऱ्याखुऱ्या ठिकाणी जाण्यास सांगितले.
मुख्य मुद्दा
हा आहे की, जर आपण शिक्षणाकडे असेच पाहत राहिलो की
ते फक्त शाळेत येवून
माहिती मिळविणे इतकेच आहे
आणि ते अनुभवातून शिकणे नव्हे,
किंवा मुलांच्या आवाजाला ताकद देणे किंवा अपयशाला कवटाळणे नव्हे,
तर आपण काहीतरी चुकत आहोत.
आणि हे सगळे सर्वजण आज बोलतायत ते
अशा शिक्षण पद्धतीत शक्य होणार नाही ज्यात
या गुणांना किंमत नाही आहे,
कारण आपण तेथे प्रमाणीकृत चाचणी
किंवा फक्त एकच बरोबर उत्तराच्या संस्कृतीने पोहचू शकणार नाही.
आपल्याला माहिती आहे हे अजुन ही चांगले कसे करता येईल,
आणि ते करण्याची वेळ आता आली आहे.
(टाळ्या)