हे इतिहासातील सर्वात अफाट
आणि संक्रामक साम्राज्य होते-
कोरिया पासून युक्रेन पर्यंत व सायबेरिया
पासून दक्षिण चीन पर्यंत विस्तारलेले
आणि मोकळ्या प्रदेशांवरही याचा ताबा होता.
इ. स. १२व्या शतकामध्ये,
मंगोलसाम्राज्य बनण्यापूर्वीं,
मंगोलचे विखुरलेले गट पूर्व आशियाई विस्तृत
गवताळ प्रदेशात वास्तव्य करीत असत,
आणि तुर्किय भटक्या खेडूतांवर
खानांचे राज्य होते.
हे लोक मेंढ्या, गुरे, याक व उंट पाळीत असत,
रगीच्या तंबूमध्ये राहून, ऋतूनुसार
छावण्या स्थलांतरीत करीत असत.
याभटक्या गटांतील स्त्रियांकडे
महत्वाचे अधिकार होते.
स्थलांतरणाचे, बराचश्या कळपांचे
आणि व्यापाराचे व्यवस्थापन करणे.
त्यादरम्यान पुरुषांनी आरोहित युद्धांमध्ये
विशेषता प्राप्त केली होती.
अनेकदा ही भटकी गटे एकमेकांत भांडायची
तेमुजीनच्या राज्याखाली ही भांडणे थांबली,
ज्याचा जन्म मंगोलच्या खानदानी कुटुंबात झालेला
लहान वयात वडील गमावून
आणि गरिबीत वाढ होऊन देखील,
तो इतर नेत्यांसह कौशल्याने युती करून
त्वरीत सत्तेवर आला.
खानांप्रमाणे न करता तेमुजीनने सैनिकांना
त्यांच्या गुणवत्तेनुसार बढती दिली
आणि लुटलेल्या वस्तूंचे वितरण
त्यांच्या मध्ये समान रीतीने केले.
त्याची सर्वात हुशार चाल म्हणजे काबीज
केलेल्या भटक्या विमुक्त माणसांना स्वतःच्या
सैन्यामध्ये असे पसरवले की ज्याने करून ते
त्याच्या विरोधी परत एकसंध होऊ शकत नाहीत.
या नवकल्पनांनी त्याला अजिंक्य बनवले,
आणि १२०६ पर्यंत, त्याने रगीच्या भिंतीं
असलेल्या तंबूंतील लोकांना एकत्र केले,
आणि तो बनला: 'चिंग्गीस खान'!
मंगोल लोक स्वतःला देवऋषी मानत,
नैसर्गिक दैवी शक्ती
आणि पूर्वज त्यांच्या सभोवताली आहेत
असा त्यांचा दृढविश्वास होता.
आकाशातील 'तेंगगेरी' देव
त्यांच्यासाठी सर्वकाही होता.
चिंगीस खानची अशी समजूत होती की
आपण संपूर्ण जगावर विजय मिळवावा
ही तेंगगेरीची इच्छा असणार
मंगोलियन मैदानावरील भटक्या विमुक्त लोकांना
एकसंध करून हे शक्य वाटत होते.
जी व्यक्ती मंगोलांना विरोध करीते,
ती तेंगगेरीला विरोध करते असे मानले जाई
अश्या आज्ञाभंगामूळे
त्या व्यक्तीस मारले जाई.
चिंग्गीस खानच्या अधिपत्याखाली,
मंगोल लोकांनी प्रथम उत्तर चीन आणि
पूर्व इस्लामी जमीनींवर कब्जा केला.
१२२७ साली, त्याच्या मृत्यूनंतर,
राज्यकारभाराचा आदेश त्याच्या कुटूंबाकडे
म्हणजेच सुवर्ण वंशाकडे गेला.
१२३० च्या दशकात,
चिंग्गीस खानच्या मुलामुलींनी
मध्य आशियातील टर्कीय आणि रशियाचे राजपुत्र
यांवरही विजय प्राप्त केला,
नंतर १२४१ मध्ये,
त्यांनी दोन युरोपिय सैन्ये नष्ट केली.
१२५० च्या दशकात, मंगोल्यांनी इस्लामचा
बगदादपर्यंतच्या प्रदेशावर कब्जा केला,
१२७९ च्या अखेरीस, त्यांची पूर्वेकडील सत्ता
दक्षिण चीन पर्यंत विस्तरली होती.
मंगोल साम्राज्यातलेतील जीवन फक्त युद्ध,
लुटमार आणि विनाश एवढेच नव्हते.
मंगोल लोक एक प्रदेश जिंकल्यावर,
तेथील अंतर्गत राजकारण स्वतंत्र सोडत असत
व त्यावर राज्य करण्यासाठी,
स्थानिक प्रशासकांचा वापर करत.
स्थानिक नेते त्यांच्यासाठी पूजा करत राहिली
तोपर्यंत मंगोललोकांनी सर्वधर्म वाढू दिलीत,
जरी ते नियमितपणे कारागीर, विद्वान
आणि अभियंता यांवर कब्जा करत असत,
तरी या विशेषज्ञांच्या कौशल्याचे
कौतुकही करत असत
व कामानुसार आशियातील विविध ठिकाणी
स्थायिक होण्यास त्यांना मजबूरही करत असत.
साम्राज्यातील सर्वात मौल्यवान उत्पादन
होते, ते सोन्याच्या जरींचे,
यासाठी चीनकडून रेशिम, तिबेटकडून सोने
आणि बगदादमधील विणकर वापरण्यात येत असत.
मंगोलचे राजे ह्या सोन्याची जरींचा वापर
स्वतःच्या कपड्यांसाठी, घोड्यांवर
आणि तंबूच्या अस्तरासाठी देखील करत असत.
मंगोल लोकांनी विशेषत: चीनमधील
बंदूक तंत्रज्ञानांना अनमोल मानले होते.
युरेशियाच्या राजकीय युतीमुळे
'रेशीम-रस्त्या'वर व्यापाराची वाढ झाली,
यास मदत झाली ती घोड्यावरील संदेशवाहक
आणि रिले टपालाच्या विस्तृत प्रणालीची
समुद्रावर जोरदार व्यापार चालूच होता,
विशेषत: निळ्या-पांढर्या पोर्सिलेनचा,
ज्यामध्ये मंगोल-चीनमधील पांढरे कुंभारकाम
आणि मंगोल-इराणमधील नीळ एकत्रित दिसत होते.
पण हे टिकू शकले नाही.
ग्रेट खानचा वारसा आपोआप
ज्येष्ठ मुलाकडे गेला नाही,
परंतु त्याऐवजी भाऊ, काका आणि चुलत्यांनी
नेतृत्त्वासाठी प्रयत्न केले होते
त्यात ज्येष्ठ विधवा त्यांच्या लहान
मुलांसाठी प्रशासनाचे कामे करीत असत.
१२६० च्या दशकापर्यंत,
चिंगीस खानचे नातू वारवंशामुळे उडालेल्या
गृहयुद्धात आवेशयुक्त झाले होते,
अखेरीस ते क्षेत्र चार स्वतंत्र
साम्राज्यांत वाटले गेले.
चीनमध्ये, कुबलई खानचे युआन साम्राज्य
विज्ञान आणि संस्कृतीचा
सुवर्णकाळ म्हणून स्मरणात आहे.
इराणमध्ये, इल-खानाने नवीन स्मारक वास्तुकला
आणि पर्शियन सूक्ष्म चित्रकला यांचा
विकास सुरु केला.
मध्य आशियात, चगाताई-खानाने
तैमूरसारखे नेते पुढे आणले
आणि त्याचा वंशज बाबर याने
भारतातील मोगल साम्राज्य स्थापित केले.
आणि गोल्डन होर्डने पूर्वयुरोपात राज्य
केल्यानंतर 'मस्कॉवी' व्यापाऱ्यांची
जागतिक शक्तीमध्ये वाढ झाली.
जरी हे साम्राज्य थोड्याच वेळ टिकले,
तरी मंगोल लोकांच्या
जागतिक वर्चस्वाचा वारसा आजही अतुलनिय आहे.