सभापती व मंत्रीगण , मी आज पुन्हा ऐकत आहे माझा विभाग किती बेजाबदार झाला आहे . आपल्याला हेराची काय गरज आहे हे विचित्र नाही का? मी काही वेगळे ऐकण्याची अपेक्षा तुमच्याकडून करीत होत्ये. पण सत्य ऐकून मी धास्तावले . मी घाबरले आहे कारण आपल्या शत्रूची पूर्ण महिती नाही . ते नकाशावरही दिसत नाहीत . शत्रू कोणी देश नाही तर ते काही व्यक्ती आहेत. तुमच्या भोवती पहा तुम्ही कोणासं भिता ? तुम्हाला त्यांचा चेहरा दिसतो ? गणवेश दिसतो ?झेंडा ?नाहीना ? आपले जग आता पारदर्शक राहिले नाही. अपारदर्शक झाले आहे ते . त्या सावल्या आहेत आणि आपल्याला त्यांच्याशी लढायचे आहे आम्हाला बेजबाबदार ठरविण्यापूर्वी स्वतःला विचारा तुम्हास किती सुरक्षित असल्याचे वाटते ? आणखी एक सांगायचे आहे मला माझे स्वर्गवासी पती काव्यप्रेमी होते . आणि मी ....' माझ्या सद्हेतू विषयी काहीजण साशंक आहेत , आज मला टेनिसनच्या ओळी आठवतात. 'आज आम्ही इतके सामर्थ्यवान नाहीत " जुन्या काळात होतो तसे पृथ्वी स्वर्गावर अधिराज्य करणारे तसे होतो आपण पूर्वी : धैर्यशाली कृती करणारे, नशीब व काळाने ज्यांना जर्जर केले होते तरीही प्रयत्नशील होते मार्ग शोधण्यात