जेव्हा मी लहान होते,
माझ्या आईने आणि मी एक सौदा केला
प्रत्येक सत्रात तीन दिवसांची मानसिक
विश्रांती घेण्याची मला परवानगी होती
तोवर जोपर्यंत मी शाळेत
चांगली प्रगती करत होते.
मी केवळ सहा वर्षांची असताना
माझ्या मानसिक स्वास्थ्याचा
प्रवास सुरु केला.
मी कायम एक योद्धा असल्याचे
मला माझे शिक्षक म्हणत असत.
नंतर लक्षात आले कि मला
आघातामुळॆ चिंतेचा विकार
आणि नैदानिक उदासीनता आहे.
यामुळे माझी वाढ पुष्कळ कठीण झाली.
मी खूप गोष्टींमुळॆ चिंतेत होते,
जी बाकी मुलांना नव्हती
आणि शाळा कधीकधी खूप त्रासदायक वाटायची.
त्याचा परिणाम मानसिक थकवा,
घाबरटपणा असा असायचा
कधीकधी मी खूप उत्पादक असायची,
तर कधी कधी काहीही करता यायचे नाही.
आणि हे सगळे त्या काळात होत होते
जेव्हा मानसिक स्वास्थ्यविषयी
चर्चा होत नसे
आता जितकी होते तितकी
विशेषतः तरुणांविषयी.
काही सत्रांमध्ये मी
ते विश्रांतीचे दिवस पूर्ण उपभोगले
तर कधीकधी त्यांची गरज
हि नव्हती पडत.
पण मुद्दा होता कि ते
पर्याय म्हणून उपलब्ध होते
त्यामुळे मी आनंदी, निरोगी आणि
यशस्वी विद्यार्थी असायचे.
आता मी त्या कौशल्यांचा वापर करते
जे मी लहानपणी शिकले होते
मानसिक समस्या असलेल्या
विद्यार्थ्यंना मदत करण्यासाठी
आज मी तुम्हाला किशोरवयीन मानसिक
स्वास्थ्यसंबंधी जागृत करण्यााठी आली आहे
काय सुरू आहे? आपण इथे कसे पोहोचलो
आणि आपण काय करू शकतो ?
पण सर्वप्रथम हे जाणून घेणे गरजेचे आहे
की प्रत्येकाला माझ्या सारखा
मानसिक आजार असेलच असे नाही
पण सगळ्यांना
मानसिक आरोग्य आहे.
आपल्या मेंदू आहे ज्याची
काळजी घ्यावी लागते.
ज्या पद्धतीने आपण
शरीराची काळजी घेतो त्याप्रमाणे.
आपले शरीर आणि शिर जोडलेले आहेत,
फक्त मानेमुळेच नव्हे
मानसिक आरोग्य
शारीरिक पद्धतींमध्ये व्यक्त होते.
जसे की मळमळ, डोकेदुखी,
थकवा आणि धाप लागणे
मानसिक आरोग्य आपल्या
शरीरा.वर परिणाम घडवून आणते
तर आपण अशा उपाययोजना करायला नको
का ज्या सर्वांना उपलब्ध असतील ?
हे मला माझ्या कथेच्या
दुसऱ्या भागाकडे घेऊन जाते.
उच्च प्राथमिक शाळेत
मी माझे मानसिक आरोग्य
जपण्यात निपुण झाले
मी यशस्वी विद्यार्थी होते.
आणि मी ओरेगॉन विद्यार्थी
परिषदेची अध्यक्ष होते
जेव्हा माझ्या हे लक्षात
येण्यास सुरुवात झाली की
मानसिक आरोग्य ही खूप मोठी समस्या आहे,
केवळ माझ्याचकरिता नव्हे.
दुर्दैवाने माझ्या जन्मस्थानी
आत्महत्येचे प्रमाण खूप जास्त होते,
मी उच्च प्राथमिक शाळेत
प्रथम वर्षात असताना
मी त्या शोकांतिका अनुभवल्या
ज्यांनी आमच्या समाजाला हादरून टाकले
राज्यस्तरीय परिषदेची अध्यक्ष असल्यामुळं
आणखी कथा माझ्या कानावर येऊ लागल्या
विद्यार्थ्यांकडून ज्यांच्या
शहरात असे प्रकार घडत होते.
आणि २०१८ मध्ये वार्षिक उन्हाळी शिबिरात
१०० उच्चप्राथमिक
विद्यार्थ्यांसाठी संस्था उभारली
किशोर मानसिक आरोग्या
बद्दल चर्चा करण्यास
आम्ही काय करू शकत होतो ?
आम्ही या संभाषणला
सहानुभतीपूर्वक सुरुवात केली
आणि प्रामाणिकपणे,
निकाल धक्कादायक होता.
सगळ्यात जास्त आश्चर्य याचे
कि माझ्या सगळ्या सहकार्यांची एक कथा होती
त्यांच्या शालेय मानसिक संघर्षाची.
फरक नव्हता की ते पूर्व ओरेगॉन
येथील छोट्या शहरातील होते
अथवा पोर्टलॅंडच्या मध्य शहरातील
हे सर्वत्र घडत होते.
आम्ही स्वतः संशोधन केले
आणि असे आढळून आले कि
१० ते २४ वयोगटा मध्ये ऑर्गोरन
येथे आत्महत्या हे मृत्यूचे
दुसरे अग्रगण्य कारण होते
आम्हाला काही करायचे होते
त्यामुळे येत्या काही महिन्यांत
आम्ही स्टुडंट्स फॉर हेल्थ ओरेगॉन
संस्था स्थापन केली
आणि आम्ही मानसिक आरोग्य
काळिमा दूर करण्यास सज्ज झालो
आम्हाला शाळेतदेखील मानसिक आरोग्याला
प्राधान्य मिळावेसे वाटत होते
काही मानसिक आरोग्य तज्ज्ञांची मदत घेऊन
आम्ही २१२९ कायद्याचा मसुदा पुढे ठेवला
यामुळे विद्यार्थ्यांना मानसिक
आरोग्याकरिता शाळेतून एक दिवसाची
मुभा मिळवी ज्याप्रकारे
शारीरिक शिक्षणदिनासाठी मिळते
कारण बऱ्याचदा एक दिवस
खूप चांगले आणि वाईट
असा फरक घडवून आणतो
ज्याप्रमाणे माझी आई मला
मी लहान असताना द्यायची
आणि पुढच्या काही महिन्यांत,
आम्ही मसुदयासाठी
मोहीम उभारली
व संशोधन केले
जून २०१९ मध्ये
कायदा मंजूर झाला
(टाळ्यांचा गजर)
हा ओरेगॉन येथील विद्यार्थ्यांसाठी
नाविन्यपूर्ण क्षण होता
हे कसे घडते याचे
एक उदाहरण बघुया
समजा एका विद्यार्थ्याचा
महिनाभर संघर्ष सुरू आहे
तो थकलेला आहे,
शाळेत मागे पडत आहे आणि
त्याला मदतीची गरज आहे
कदाचित त्यानी पालकांसमोर कधी
मानसिक आरोग्यविषयी चर्चा केली नाही
पण आता त्यांच्या बाजूने कायदा आहे
जो त्यांना संभाषण सुरू कण्यास मदत करेल
पण पालकांनी आताही शाळेत फोन करून
गैरहजरीचे कारण कळवने आवश्यक आहे
त्यामुळे विद्यार्थ्यांना
मुभा विनाकारण नाही
सगळ्यात महत्वाचे म्हणजे,
आता विद्यार्थ्यांचे गैरहजर असणे हे
नोंदवले जाते
त्यामुळे आढावा घेता येतो
कि किती विद्यार्थी किती
दिवसाच्या सुट्ट्या घेतात
जर विद्यार्थी
खूप गैरहजर राहतो
त्यांना शाळेतील समुपदेशकांकडून
मार्गदर्शन करण्यात येईल
आणि हे म्हत्वाचे आहे कारण
आपण जे विद्यार्थी संघर्ष करत आहेत
त्यांना खूप उशीर
होण्याआधी ओळखू शकतो
आम्ही २०१८ साली संस्थेत ऐकलेल्या
महत्त्वाच्या गोष्टींपैकी एक म्हणजे
की कधीकधी पुढे येऊन मदत मागणे
ही अतिशय कठीण गोष्ट असते
आम्हाला आशा आहे की हा कायदा
त्याकरिता मदत करेल
आणि हे फक्त बालकांना स्वतःची
काळजी कशी घ्यावी हेच शिकवत नसुन
ताणतणाव व्यवस्थापन कसे करावे
यासोबतचते आपला जीव सुद्धा वाचवते
आता विविध राज्यातील विद्यार्थीदेखील
हा कायदा लागू करण्यात प्रयत्न करत आहेत
मी सध्या कॅलिफोर्निया आणि
कॉलोराडो येथे विद्यार्थ्यांसोबत
त्याचकरिता
काम करत आहे
आम्हाला असा विश्वास
वाटतो की विद्यार्थांना
चांगले वाटण्याचा हक्क आहे
व्यवहारीक आणि तांत्रिक कारणे बाजूला सारून
कायद्याचा मसुदा २१९१ त्यामागे
असलेल्या संकल्पनेमुळे अतिशय खास आहे
मानसिक आणि शारीरिक आरोग्य
यावर बरोबरीने उपचार करायला हवा
कारण प्रत्यक्षात ते जुळलेले आहे
उदाहरणार्थ आरोग्य सेवा
सिपीआरचा विचार करा
तुमच्या वर अशी वेळ आली की
तुम्हाला प्रशासन चालवले लागले
तर तुम्हाला काय करावे याबाबत
माहिती असेल का ?
स्वतः विचार करा
बहुतांश हो, कारण सिपीआर प्रशिक्षण
हे शाळेत आणि महाविद्यालयात दिले होते
ऑनलाइन पद्धतीने सुद्धा
आपल्याकडे गाणी देखील
आहेत जी त्यानुसार चालतात
पण मानसिक आरोग्याचे काय ?
मी सातव्या इयत्तेत असताना आरोग्य वर्गात
सिपीआरचे प्रशिक्षण दिले होते
पण मी सातव्या इयत्तेत असताना
मला मानसिक आरोग्य व्यवस्थापन कसे करावे
मानसिक संघर्षाचा सामना
कसा करावा हे शिकवले तर ?
मला असे जग बघायला आवडेल
जेथे प्रत्येकाकडे कौशल्यांची शिदोरी आहे
आपले मित्रवर्ग, सहकारी,
घरचे सदस्य किंवा
अनोळखी व्यक्ती यांना
मानसिक संघर्षाचा सामना करताना
मदत करता येईल अणि ही साधने
विशेषतः शाळेत उपलब्ध असावी
कारण तिथेच विद्यार्थी
सर्वात जास्त संघर्ष करतात
दुसरी संकल्पना ज्याची मला तुम्हाला
ओळख करून द्यायची आहे
ती म्हणजे नेहमी स्वस्थ असणे गरजेचे नाही
नेहमी खंड पडू देणे अयोग्य नाही
पूर्ण दिवस व्यतीत करणे गरजेचे नाही
कधीकधी ते तितके वास्तविक वाटत नसते
पण स्वतः ची काळजी घेणे आवश्यक आहे
समजा आयुष्य एक स्पर्धा आहे...
खूप मोठ्याअंतराची स्पर्धा
जर तुम्ही खूप आधीपासूनच
भरधाव वेगाने धावले तर तुम्ही थकून जाल
तुम्हाला त्यापासून इजा देखील होऊ शकते
जर वेगाचा आढावा घेतला
जर मुद्दाम थोडे हळूहळू अंतर कापले
आणि काहीवेळा थोडा वेग वाढवला
तर तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल
त्यामुळे कृपया
एकमेकांची काळजी घ्या
किशोरवयीन मुलांची
आणि बालकांची काळजी घ्या
विशेषतः त्यांची जे नजरेस येत नाहीत
मानसिक आरोग्याचे
आव्हान संपुष्टात येणार नाही
पण एक समाज म्हणून
आपण त्यांचे व्यवस्थापन
कसे करावे हे शिकू शकतो
एकमेकांची आणि स्वतः ची काळजी घेऊन
ज्याप्रमाणे माझी आई म्हणायची
कधीकधी थोडी विश्रांती घ्या
धन्यवाद
(टाळ्यांचा गजर)