कायम बदलणारे जग हिच हया काळाची वास्तवत: अाहे
अनेक लोक मोठ्या प्रमाणात अनेक महानगराकडे स्थलांतर करु लागले अाहेत
काही गगनचुंबी इमारतीत स्थाइक होतात
तर काही झोपडपट्टीत घर बनवतात.
अन्नाची अाणि इंधनाची कधी न भागणारी भूक,
बदलणारे, न सांगता येणारे विचित्र हवामान,
अाणि हे सर्व घडते अाहे - जेव्हा लोकसंख्या अजुनही वाढत असताना
अापल्याला हयाची चिंता असावी का?
अापल्याला हयाची भिती असावी का?
हया सर्वातून काय निष्कर्श काढायचा?
हया जागाच्या पाठीवर सातशे कोटी लोक राहातात - ही अपूर्वाईची गोष्ट नव्हे का?
परंतू या पार्श्वभूमीवर, जगाच्या अाणि भविष्याच्या काळजीने काही लोक घबरलेले अाहेत.
काही लोक या विषयी विचार करायचे सुद्धा सोदून देतात.
परंतू हया रात्री मी तुम्हाना खरे काय अाहे हे दाखवायचा प्रयत्न कारेन।
माझे नाव हान्स रोझलिंग् . मी अाकडेवारी संख्यावारी कारणारा - -
नको, नको, नको, नको, बंद करु नका - --
- - कारण संख्याशास्त्राला मिळालेल्या नवीन माहितीतून मी तुम्हास हे जग नव्या द्र्ष्टीकोनातुन दाखवेन
लोकसंख्या कशा (वेगळ्या) पद्धतीने वाढत अाहे हे तुम्हास सांगेन
आाणी अाज दिसत असलेल्या माहितीवरून भविष्यातिल जग कसे असेल ते ही दाखवून देईन.
नक्कीच अापल्यासमोर फार मोठी अाव्हाने ऊभी अाहेत!
परंतू चांगली बातमी म्हणजे भविष्य येवढे अंधाकारमय नाही।
अाणि मनुष्यप्राणी तुम्हाला वाटतो त्यापेक्षा खूप सुधारला अाहे.
घाबरू नका!
लोकसंख्येबाबतची सत्यता
प्रोफेसर हांस् रोझलिंग यांच्या बरोबर
तान्ही मुले - - -
प्रत्येक (मूल) एक अाशीर्वाद - - -
परंतू अनेक लोकांना वाटते की लोकसंख्येची वाढ अनियंत्रणीत अाहे
काहीजण म्हणतात की (हा) लोकसंख्येचा बॉम्ब अाहे
ते ऊचित अाहे का?
मग सध्या अापलि लोकसंख्या कशी अाहे? आापण या (अवस्थेपर्यंत) कसे पोचलो?
मी तुमहाला अातपर्यंत जन्मलेल्या प्रत्येक व्यक्तीचा इतिहास सांगणार अाहे
बर, निदान गेल्या हजार वर्षाचा तरी
अाता सुरू करु
मी तुम्हाला दोन अक्ष देतो
हा काळाचा - अाणी हा इथला जागतीक लोकसंख्येचा
अब्जाच्या च्या टप्यात
इश्र्वीसनपुर्वी १०००० वर्ष, जेंव्हा मनूष्यप्राणी सर्वप्रथम शेती करूलागला -
त्याविषयी पुराणवस्तू तज्ञ असा अंदाज करतात की
त्यावेळी जगाची लोकसंख्या केवळ एक कोटी होती
कल्पना करा - फक्त एक कोटी! म्हणजे अाजचा स्वीडन् देश
संपूर्ण जग फक्त स्वीडन् देशियांनी भरलेले
परंतू जशी हजार वर्षे मागे पडू लागली तसे अजुन शेतकरी,
अजुन अन्न अाणि अजुन माणसे --- अाणि बरीच साम्राज्ये निर्माण झाली
इजिप्त, चीन, भारत - - - अाणि शेवटी युरोप!
अाणि लोकसंख्या सुद्धा वाढू लागली, परंतू सावकाशीने.
अाणि मी इथे थांबतो, सन १८००.
कारण १८०० साली, जगाची लोकसंख्या १ अब्जाला पोचली
कल्पना करा - ह्या सर्वकाळात, हजारो वर्षे, लोकसंख्येची वाढ एक (दशांश) टक्क्याहूनही कमी असे (प्रत्येक वर्षी)
पण १८०० सालानंतर, औद्योगिक क्रांतीमुळे सगळेच बदलले अाणि लोकसंख्या दरवर्षी वेगाने वाढू लागली
अवघ्या १०० वर्षात, ती २ अब्ज्यापर्यंत पोचली
आाणि नंतर, मी जेंव्हा शाळेत होतो, ती ३ अब्ज होती
मग बरेच लोक म्हणू लागले: "पृथ्वीनक्षत्र येवढ्या लोकांचा भार
सांभाळू शकणार नाही". अागदी तज्ञ लोकांचे पण तेच म्हणणे
पण घडलेते ते असे - - -
अापण ४ अब्ज - - ५ अब्ज - - ६ अब्ज - - ७ अब्ज!
विचार करा --- निम्याहून जास्त लोकसंख्या केवळ माङया अायूष्यात निर्माण झाली अाहे.
अाणि तो अकडा अजुनही वाढतो अाहे
ही लोकसंख्येची वाढ, अलिकडील वर्षात, अाशियाई देशात झालेली अाहे
उदाहरणार्थ, इथे बांगलादेशात - - - जिथे लोकसंख्या तिपटीने वाढली केवळ माझ्या अायूष्यभरात
५ कोटी वरून १५ कोटींपर्यंत
तो अाता जगातला सार्वात घनदाट लोकसमख्येचा देश अाहे
साधारणपणे दीड कोटी लोक खूप गर्दी झालेल्या राजधानीत, ढाक्यात राहातात
येथील लोक, शहरातले असोत अथवा खेड्याकडील असोत,
स्वतःच्या कुटुंबसंख्यच्या प्रचंड काळजीत अाहेत
पण एक नवीन बांगलादेश उदयोन्मूख होत अाहे
ह्या खान कुटुंबाचे उदाहरण. आाई तस्लिमा, मुली तंजिना अाणि छोटी सदिया
अाणि वडिल हन्नान.
बायकांना तयार व्हायला खूप वेळ लागतो, पुरुष तेवढा वेळ लावत नाहीत.
जर तू हातानी पुसुन टाकणार असशील तर मग लावतेस कशासाठी?
तस्लिमा अाणि हन्नान दोघेही स्वतः खूप मोठ्या कुटुंबातूनच अालेले
पण त्यांनी ठरवले की फक्त दोनच मुले होवू द्यायची।
तस्लिमा अाणि हन्नान हे मोठ्या कुटुंबपासून दूर जाउलागलेल्या संस्क्रुतीतले भागीदार अाहेत
अाणि तस्लिमाचीतर ही नोकरीच झाली आाहे
ती कुटुंब नियोजनाची सरकारी नोकरी करते
जे (सरकार) तिच्यासारख्या बायकांना प्रत्येक खेड्यात नोकरीस ठेवतात.
ती दारोदार जाउन इतराना लहान कुटुंब ठेवण्यासाठी मदत करते
तस्लिमा त्याना सल्ला देते, नैतीक अाधार देते अाणी सर्वात महत्वाचे,
वेगवेगळी गर्भनिरोधके पुरवते
तर तस्लिमा या गर्भधारणाचा दर कमी करण्य़ात कितपत यशस्वी झाली अाहे?
म्हणजे, प्रत्येक स्त्रीला होणार्या बाळांची सरासरी संख्या
अाम्ही स्वीडन् मधे गॅपमाइंडर फौडेशनची स्थापना केली
कारण जगातील सागळी सांख्यीक माहीती सर्वांना सोप्यारितीने पुरवता यावी
यामुळे मी तुम्हाला बांगलादेशातील परिस्थिती अाणि काय घडले अाहे हे दाखवू शकेन
हा, अाडवा अक्ष, स्त्रीला होणार्या बाळांची सरासरी संख्या
अागदी १, ते २ - - - ७ ते ८
अाणि हा उभा अक्ष, तो अायूष्यमर्यादेचा
आयुर्मानाचा, नवजात बाळ कीती अायुष्य जगेल याचा
३० पासून ते अागदी ९० पर्यंत
अाता - - - अापण १९७२ मधे सूरूवात करू
हे वर्ष बांगलादेशाला महत्वाचे, ज्या वर्षी त्या देशाला स्वातंत्र्य मिळून वर्ष झाले
त्यावर्षी, बांगलादेशाची परिस्थिती ही इथे होती
अाणि तिथे स्त्रीयां सरासरी ७ बाळांना जन्म द्यायच्या
अाणि सरासरी आयुर्मान ५० वर्षापेक्षा कमी होते.
मग स्वातंत्र्यानंतर काय झाले?
बांगलादेशात आयुर्मानाची वाढ झाली का? तिथे बाळांचे जन्मप्रमाण कमी झाले का?
इथे सगळी अाकडेवारी माहिती अाहे. मी बांगलादेश सुरू करतो.
नक्कीच, आयुर्मान वाढत अाहे, जन्मप्रमाण, कमी कमी - - - ६ - - - ५
अाणि आयुर्मान अजूनही लांबत आाहे - - - ४ - - -३
अाणि अाता जन्मप्रमाण जवळजवळ २ पर्यंत अाले अाहे, २.२ ह्यपर्यंत.
आाणि अायुर्मान हे सत्तरी पर्यंत लांबले अाहे
हे पूर्णपणे अाश्चर्यकारक अाहे! गेल्या ४० वर्षात, बांगलादेश बदलल अाहे
७ पासून ६ - ५ -४ - ३ - २
हा चमत्कार बांगलादेशात घडला अाहे!
पण ही गोष्ट फक्त बांगलादेशाचीच अाहे का? बर,
मी तुम्हाला सगळे जग दाखवतो
मी ५० वर्ष माघार काळी जातो - १९६३ सालात
ईथे सगळे देश अाहेत.
हीरव्या रंगात उत्तर अाणि दक्षीण अमेरिका.
पिवळ्या रंगात युरोप, पूर्व अाणि पश्चिम
निळा म्हणजे आाफ्रिका, उत्तर अाणि सहारा वाळवंटाच्या दक्षीणेस.
अाणि लाल हा अशिया खंड, त्यात अाम्ही अॉस्ट्रेलिया अाणि न्यू झिकंड़ घेतले अाहे.
गोलाचा अाकार जेवढा मोठा तेवढी लोकसंख्या मोठी.
हे तिथले मोठे गोल म्हणजे चीन व भारत. बांगलादेश त्याच्या मागोमाग.
१९६३ साली जागतीक जन्मप्रमाणाची सरासरी होती ५.
पण ते दुभागलेले जग होते - - - ते तुम्हाला दिसते किंवा जाणवते का?
हे ईथले देश, विकासलेले, त्यांची कुटुंबे छोटी होती अाणि अायुष्य मोठे होते.
अाणि मग हे विकसनशील देश, अाणि त्यांची मोठी कुटुंबे व छोटे अायुष्य
ह्या तफावतीच्या मध्यावर फार कमी देश होते.
पण अाता अापण बघू काय घदले ते.
मी जगाची सुरुवात करतो!
हे पहा - - -
तूम्हाला दिसेल, चीन, मोठ्ठा गोळा, त्यांचे अारोग्य सुधारले
अाणि त्यानी कुटुंब नियोजनास सुरुवात केली अाणि त्यांची कुटुंबे छोटी झाली।
हा हिरवा, बघा मेक्सिको, तो तिथे येत अाहे.
हा ब्राझीलसुध्धा, लॅटीन अमेरिकेतला हिरवा.
अाणि हा भारत, मागोमाग येतोय.
हे सगळे मोठे अशियातले लाल गोळे, सागळे त्याच मार्गी.
अनेक अाफ्रीकेतील देश मात्र अजूनही
दर स्त्री मागे बर्याच बाळांचा जन्म होतो अाहे .
अाणि तिथे बांगलादेशाने भारतापुढे
अाघाडी घेतली कुटुंब छोटे करण्यामधे.
अाणि अाता जवळजवळ सगळेच देश भागाकडे सरकू लागले,
अागदी अाफ्रीका देखील वर वळू लागलाय
अोह्! तो हेएटी मधला भूकंप!
आणि आता सगळेच वरपर्यंत पोचले. केवढा मोठा फरक!
अाज सगळ्या जगाची जन्मप्रमाणाची सरासरी अाहे २.५
केवळ ५० वर्षापूर्वी ती होती ५.
जग बदलले अाहे: प्रत्येक स्त्री मागे बाळांचे जन्मप्रमाण ५ वरून २.५ वर आले आहे
अाणि ते अजून उतरते अाहे - - - , केवढा मोठा फरक!
लोकांना वाटत असे की बांगलादेश आणि त्यासारखे देश हे
लोकसंख्येच्या बॉम्बचे मूळ किंवा मध्य!
परंतू ते किती चूकीचे होते!
माझ्या मते, श्रीमति तलिस्मा आणि तिच्यासारखे आरोग्य कर्मचारी,
ज्यानी त्यांचे देश, हया बाजूपासून - - - आगदी - - - काही दशवर्षात
ह्या चांगल्या आरोग्याकडे आणि छोट़या कुटुंबाकडे नेले
हे आपल्या काळातले धेय्यवादीच आहेत!
हा आश्चर्यजनक बदलच घडला आहे.
आपण आता विभागलेल्या जगात रहात नाही.
पण किती लोकांना हया आश्चर्यजनक बदलाची जाणीव आहे?
गॅपमाइंडर मधे आम्ही फक्त संख्याच पुरवत नाही,
आम्ही लोकांना कितपत माहीत आहे याची देखिल नोंद घेतो.
म्हणून आम्ही स्वीडन् मधे पहिला आढावा घेतला.
त्याचे परीणाम मात्र निराशावादी ठरले.
आम्ही दुसरा आढावा ब्रिटनमधे घेतला. आमच्या खूप आशा होत्या, कारण
ब्रिटीश लोक सर्वत्र जाउन आले आहेत.
आम्हाला वाटले तिथेतरी चांगले परीणाम दिसतील.
आम्ही पहिला प्रश्न विचारला: बांगलादेशात प्रत्येक स्त्रीमागे
सरासरी कीती मुले जन्माला येतात?
आम्हि त्यांना चार पर्याय दिले: २.५, ३.५, ४.५ व ५.५
आणि हा ब्रिटीश आढाव्याचा निकाल.
पण तुम्हाला खरे उत्तर माहीत आहे: ते म्हणजे २.५
केवळ १२ टक्के लोकांना बरोबर उत्तर देता आले.
आम्हाला वाटलेकी कदाचित् अशिक्षित लोकांच्या
उत्तरामुळे टक्केवारी कमी झाली असावी.
म्हणून आम्ही ज्याना कॉलेज डीग्री नाही
आणि ज्याना कॉलेज डीग्री आहे, यांचे विभाग केले.
आणि इथे ते आहेत. हा परीणाम!
पण त्यांची उत्तरे अजूनच वाइट
आता तुम्ही असा निष्कर्ष काढाल की ब्रीटीशांना
जगाविषयी कमी माहिती आहे
नाही नाही!
मी जर एका वानराला आणि त्याच्या मित्रांना हा प्रश्न विचारला तर?
मी एकेका केळ्यावर वेगवेगळे उत्तर लिहून
त्यांना एक एक केळे उत्तरासाठी निवडू दिले असते
तर त्याचे परिणामी उत्तर असे आले असते.
अर्थात वानरांना बांगलादेशाविषयी काहीच कल्पना नाही
पण केवळ यादृच्छिकतेमुळे, त्यांची बरोबर उत्तरे
ब्रीटीशांच्या बरोबर उत्तरांपेक्शा दुप्पट असतील.
अर्ध्याहून अधीक ब्रीटीश लोकांचे उत्तर ४.५ किंवा जास्त असे आहे।
ही समस्या ज्ञानाच्या कमतरतेची नसून,
पूर्वकल्पित गृहित विचारांची आहे.
ब्रीटीश अशी कल्पना करू शकत नाहीत,
किंवा अंदाजही करू शकत नाहीत
बांगलादेशातील स्त्रीयांना सरासरी २.५ मुले होतात.
आणि खरेतर २.२ च आहेत सध्या.
ही गोष्ट ब्रीटीशांना माहीत नाही: की तस्लीमाआणि तिचे कुटुंब
हे बांगलादेशातील सर्वसामान्य प्रमाणाचे आहे.
आणि हे फक्त तिथेच् नाही तर जगभर आहे.
ब्राझील मधे २ मुलांचेच कुटुंब.
व्हिएतनामात २ मुलांचेच कुटुंब.
आणि भारतातसुध्दा, आजकाल २ मुलांचेच कुटुंब हे प्रमाण झाले आहे.
आणिजर तुम्ही आफ्रीकाखंडात गेलात,
जर आदीस अबाबा सारख्या मोठ्या शहरात गेलात
तर आदीस अबाबा मधे प्रत्येक स्त्रीला सरासरी २ पेक्षा कमीच मूले होतात
मग ते मुसलमान, बुध्द, हिंदू, ख्रिश्चन - - -
असा एक धर्म नाही, एक संस्कृती नाही, एक खंड नाही
जिथे २ मुलांचे कुटुंब होउ शकत नाही.
हा मोठ्या कुटुंबाकडून २ मुलांच्या कुटुंबाकडे होणारा बदल
हा माझ्याआयुष्यभरातला ह्या जगात घडलेला सर्वात महत्वाचा आहे.
हे मानवी इतिहासात अभूतपूर्वक् आहे !
तर आता आपण परत बांगलादेशात.
आपण ह्या मोठ्या वरून लहान कुटुंबाकडे होणार्या या
ऐतिहासीक आणि अभूतपूर्व बडलाची कारण मिमांसा करूयात.
आज, इस्लामिक बांगलादेशात, जवळ जवळ सगळया १५ वर्षीय
तंजिना सारख्या मुली शाळेत जातात.
ते सरकार आज त्या मुलीच्या उच्य माध्यमीक शिक्षणासाठी
तिच्या कुटुंबाला पैशाची सुध्दा मदत करतात
आजकाल तंजिनाच्या शाळेत मुलींची मुलांपेक्षा जास्त संख्या आहे.
तुम्ही ह्या धदड्यातला हा मुद्दा न समजणे अशक्य!
शीक्षण हे ऊपायकारक आहे अणि बांगलादेशीय स्त्रीयांना
अनेक नव्या संध्यांचा लाभ होत आहे.
असमानता असून देखील आज खूप नोकर्या मिळू शकतात
आणि तंजिनाने खूप उच्च ध्येय ठेवले आहे.
इथे अधिक आणि अधीक तरुण महिलांना गोष्टी कीती
वेगळ्या असू शकतात ह्याची जाणीव होऊ लागली आहे.
तस्लिमाला, तिच्या दोन मुलींसाठी एका
उज्वल भविष्याची वाटणारी आशा-ही विस्मयकारकच दिसते.
पण बांगलादेश मधल्या बदलाला
एका अत्यावश्यक परिवर्तनाचा आधार आहे.
ते (परिवर्तन) म्हणजे मूल जगण्याची एक नाट्यमय सुधारणा.
तो रमदान, मुसलमान लोकांचा उपवासाचा
आणि अंतर्मयी होण्याचा महिना.
अशा शुभ काळी, हानान आपल्या आई-वडिलांना
कुटुंबाच्या स्मशानभूमी कधे लक्ष द्यायला मदत करत आहे.
हनानची तीन भावंडे आगदी लहान असताना मृत्यूमुखी पडली.
त्यांना येथे मृत्यूनंतर पुरले आहे.
पूर्वी जेव्हा हनानचे आई-वडील तरूण जोडपे होते,
त्याकाळी वय ५ वर्षे होण्याआधीच
पाचातील एक मूल मृत्यूमुखी पडे.
सगळ्या कुटुंबांना सतत भीती असे
की एक किंवा अधिक मुले (मृत्यूमुखी) गमावतील.
गेल्या काही दशकांत बांगलादेशाने मूलभूत आरोग्याची
विशेषतः मुलांना जगवण्याची, खूपच प्रगती केलेली आहे.
लस, संक्रमण उपचार आणि चांगले पोषण आणि स्वच्छता
यामुळे देशातील लाखो मुलांच्या जीवनाचे जतन झाले आहे.
आणि आता आई-वडील म्हणून, त्यांना कल्पना आली आहे की
आपली सर्व मुले जीवीत असण्याची शक्यता आहे,
कुटुंब नियोजन मोठा अडसर शेवटी नाहीसा झाला आहे.
आगदी ढाक्यातल्या झोपडपट्टीत सुध्दा,
स्त्रीयांना आता सरासरी फक्त 2 मुले होतात.
मुले जीवीत असण्याची शक्यता वाढते यात सर्वकाही आहे.
आपण परत भुतकाळात जाऊ या.
१८०० सालापूर्वी जगाची लोकसंख्या खूप हळू का वाढत होती?
संपूर्ण इतिहासात, सर्व ऐतिहासिक नोंदी अम्हाला दर्शवतात की सरासरीने,
दोन पालकांना ६ मुले असत - कमीजास्त प्रमाणात.
पण ही तर अतिशय जलद लोकसंख्या वाढ वाटते. मग ते वाढली का नाही?
कारण, १... २ ... ३ ... ४ मुले; ती स्वत: पालक होण्याआधीच मरण पावत.
पूर्वी लोकांचे निसर्गातले वास्तव्य पर्यावर्णीय संतूलनेत नव्हते,
त्यांचा मृत्यू व्हायचा पर्यावर्णीय संतूलनेने.
हे मात्र अतीशय शोकाचेच!
पण औद्योगिक क्रांतीमुळे हे सर्व बदलले.
चांगले वेतन, अधिक अन्न, तोटीचे पाणी,
चांगले स्वच्छता, साबण, वैद्यकीय क्षेत्रातील प्रगती ....
मग या सर्व प्रगतीमुळे लोकसंख्या का वाढेली?
जास्त मुले झाली हे त्याला कारण?
नाही! मी शाळेत असताना १९६३ मध्ये जगातल्या प्रत्येक
स्त्री प्रति सरासरी मुलांची संख्या कमी होत होत ५ पर्यंत आली.
आणि मुलांच्या जगण्याचा (दर) वाढणे
हे लोकसंख्येच्या जलद वाढीचे कारण ठरले.
त्याकाळी ४ जगत
परंतू पाचापैकी एकाचा मृत्यू व्हायचा
आणि हे नक्कीच दुर्दैवाचे होते.
बहुतेक देशांनी फक्त अलीकडील काळामध्येच मुले जगवण्याच्या
आणि कुटुंब नियोजनाच्या प्रयत्नात मोठी पुढे उडी घेतली आहे.
यातून आता आम्ही एक नवीन समतोलता गाठत आहोत.
आणि ती एक सुरेख समतोलणा आहे:
सरासरी २ पालक व २ जीवीत रहाणारी मुले.
ह्यातून आम्ही एक आनंदी संतूलनातले कुटुंब केले आहे.
हीच आज जगातील सर्वसामान्य कौटुंबिक परिस्थिती आहे.
आणि यातून भविष्याविषयी काय अर्थ काढता येइल?
मी तुम्हाला (लोकसंख्या) भविष्यात काय असेल याचा सर्वोत्तम अंदाज देतो,
युनायटेड नेशन्सच्या लोकसंख्याविभागातील तज्ञ्यांकडून आम्हाला - - -
(मिळाले) आणि ते असे दिसते.
ती (वाढ) सुरुवातीस चालूच राहील, ८ अब्ज्यापर्यंत - - -
नंतर ९ अब्ज - - - मग इथपर्यंत जाईल - - -
पण बघा - ती मंद होती आहे!
शतकाअखेरी पर्यंत वाढ आगदी सपाट होतीय.
आणि मी जर यात अजून खोलात बघितले, तर तुम्हाला दिसेल
की आपण या वाढीची मंदता आणि झपाट्याने वाढणार्या लोकसंख्येला
आळा बसेल अशी अपेक्षा करू शकतो.
पण अर्थात हा अंदाज आहे आणि ह्या
अकडेवारीत काहीप्रमाणात अनिश्चितता आहे.
पण अापल्याला एक अर्थ तरी नक्की काढता येतो की
ह्या शतकात झपाट्याने वाढणार्या लोकसंख्येला आळा बसेल
हा सर्व आहे तो, "घसरणार्या जननक्षमतेच्या दर"
ह्यचा उल्लेखनीय परिणाम.
इकडे पहा. आपण ह्यात (इतिहासात) पुन्हा गेलो तर
मी हे तुम्हाला दाखवीन मुलांच्या संख्या दाखवून.
० ते १५ वर्ष वयातील मुलांची संख्या.
इथे आले ते (अकडे), बघा - - -
मुलांची संख्या हळूहळू वाढली - - - मग नंतर ती सुद्धा वेगात वाढली - - -
आणि शतकाअखेरीपर्यंत - इथे
२ अब्ज मुले जगात होती.
मला ते महत्त्वाचे वर्ष होते कारण त्यावर्षी
डोरीस् चा जन्म झाला. ती माझी पहीली नात.
तीचा जन्म झाला तो जगातील मुलांच्या द्रष्टीने
एक विशेष वेळ होता.
कारण लोकसंख्येच्या विशेषज्ञ्यांचा
या वर्षी पासूनचा अंदाज
(असा) जगातील मुलांच्या संख्येविषयीचा - -
असाच पुढे होत राहील.
या नंतर तो पुढ वाढणार नाही.
या शतकाच्या अखेरीस अपल्या जगात
अजूनही २ अब्जच मुले असतील.
डोरीस जेव्हा जन्म झाला तेव्हा जगातील
मुलांची संख्या वरच्या टोकाला पोचली होती.
मुलांच्या संख्येचा अकडा वाढत नाहीए आता.
आता ह्यमुळे तुम्हाला संभ्रम होईल.
कारण, लोकसंख्या अशी कशी वाढते,
जर मुलांची संख्या वाढत नसेल तर?
हे सगळे प्रौढ कुठुन येणार?
आणि हे समजावण्यासाठी मी ही
मोहक अंकात्मक सामग्री सोडतो.
आणि तुम्हाला आम्ही विकसित केलेले
खरेखुरे शक्तिशाली शैक्षणिक साहित्य दाखवतो.
बंधू भगिनींनो, मी तुम्हाला
आता जगातील लोकसंख्या दाखवेन.
स्पंजच्या ठोकळ्यांच्या स्वरूपात.
एक ठोकळा म्हणजे १ अब्ज
म्हणजे, आपल्याकडे २ अब्ज मूले ह्या जगात आहेत.
त्याखेरीज, अापल्याकडे १५ ते ३० वयवर्षातील
२ अब्ज लोक आहेत.
(अर्थात) हे ठोकळ आकडे आहेत.
आपल्याकडे अजून १ अब्ज लोक
३० ते ४५ वयमर्यादेतले आहेत.
आपल्याकडे अजून १ अब्ज लोक
३० ते ४५ वयमर्यादेतले आहेत.
आणि आता हा माझा ठोकळा - साठीचे आणि मोठे.
आम्ही इथे सर्वात वर.
ही आज जगातील लोकसंख्या आहे.
तुम्हाला हे दिसेल की ईथे ३ अब्ज गहाळ आहेत.
आगदी थोडेसेच गहाळ आहेत कारण ते मरण पावले आहेत.
हे बहुतेक गहाळ आहेत कारण त्यांचा जन्मच झाला नव्हता.
कारण १९८० सालापूर्वी जगात खुप कमी मुलंचे जन्म झाले होते
कारण त्याकाळी मुलांना जन्म देणार्या
स्त्रीयांची संख्या बरीच कमी होती
तर आज ही (परिस्थिती) आहे.
आता भविष्यात काय घडणार?
तुम्हाला माहीत आहे का माझ्यासारख्या
वयस्कर लोकांचे काय होते?
ते म्रत्यू पावतात.
हो! इथे कूणीतरी आहेत, जे रुग्णालयात काम करतात.
तर, - - ते म्रत्यू पावतात.
उरलेले १५ वर्षाने मोठे होतात आणि
त्यांना २ अब्ज मुले होतात
हे अाता वृध्द झाले, त्यांचा मृत्यूसमय आला.
आणि नंतर हे १५ वर्षाने मोठे होउन त्यांना २ अब्ज मुले होतात.
आणि नंतर हे १५ वर्षाने मोठे होउन त्यांना २ अब्ज मुले होतात.
आहाहा!
मुलांची संख्या न वाढता,
आयुष्यमान न वाढता,
आपल्या कधे अजून ३ अब्ज लोक होतील अाणि
नक्कीच मोठ्या लोकांची (संख्या) भरून काढतील.
हे घडेल, नेमके त्यावेळी जेव्हा
तरूण पिढीतील खूप लोक मोठे होतील.
आता इथे एक विषेश खुलासा,
जो माझ्यासारख्या वृध्द लोकांच्या दृष्टीने चांगला.
असा एक अंदाज आहे वृध्द लोकांचे अयुष्यमान वाढणार आहे.
ह्या कारणाने, आम्हाला अजुन १ अब्ज लोक इथे वर घ्यावे लागतील.
मी एका मोठ्या आकांक्षेने
अपेक्षा करतोय की मी ही त्या गटात असेन.
कारण मग मला लांब आयुष्य लाभेल आणि
वाचायला मिळेल दरवर्षी येणारी वार्षीक आकडेवारी - - -
पण मी जेव्हा अनेक समर्थ पर्यावरण कार्यकर्त्यांशी चर्चा करतो
तेव्हा त्यांच्या पर्यावरणाच्या काळजीने
ते मला नेहमी सांगतात की
"आपण लोकसंख्या ८ अब्जावे थांबवली पाहीजे."
मग, मी जेव्हा त्यांना प्रथम सांगतो, तेव्हा त्याना माहीत
नसते की आपण मुलांच्या संख्येचे उच्च टोक गाठले आहे.
आणि त्यांना हे माहीत नसते की उर्वरित लोकसंख्या वाढ
सर्व प्रौढ लोकांच्या संख्येमुळेच होइल.
तेव्हा आपण कमीजास्तप्रमाणात
येवढ्या लोकसंख्येपर्यंत पोचू.
तर, आता आपल्याला माहीत आहे कि कीती अब्ज असतील.
पण ते रहाणार कुठे?
तात्काळात आणि भाविष्यात.
ते तिथे जग, आणि इथे ७ अब्ज लोक.
७ अब्जातले, १ रहातात अमेरिकाखंडात - उत्तर आणि दक्षीण एकत्रीत.
१ युरोपात, १ आफ्रीकेत.
अणि ४ अशीयात
हे झाले सध्याचे. पण हे लक्षात कसे ठेवायचे?
माझगयाकडे लक्षात ठेवायला सोपा मार्ग असा - -
मी सगळे अकडे असे मांडतो - - -
आणि म्हणतो की जगाचा पिनकोड आहे १११४.
आता या शतकाच्या मध्यावर काय होईल?
ते आम्हाला चांगल्याप्रकारे माहीत आहे.
युरोप - - वाढ नाही! किंबहुना, युरोपियनांची लोकसंख्या कामीच होत आहे.
अमेरिका खंडात थोडेसे जास्त लोक,
मुख्यतः निवृत्त झालेले लॅटिन अमेरिकेतील लोक,
त्यामुळे फरक पडत नाही,
आणि ती (संख्या) जवळजवळ समान आहे.
अशियात अापल्याकडे १ अब्ज अजून आहेत.
आणि शिवाय अशियातली लोकसंख्यावाढही थांबली आहे.
पुढील ४० वर्षात, आफ्रीकेतील लोकसंख्या
दुपटीने वाढून २ अब्जापर्यंत पोचेल.
आता - - - ह्या शतकाच्या अखेरीकडे वळू
परंतू, आपल्याला माहीतच आहे;
युरोपात अजून लोक नाहीत, अमेरिकेत नाहीत आणि अशियात नाहीत- - -
पण आफ्रीकेचे नक्की आहे,
अपल्याजवळील अकदेवारीवरून आता पुन्हा दुप्पट
म्हणजे, अाफ्रीकेत ४ अब्ज होतील.
२१०० साली, आणि त्यावेळचा पिनकोड असेल ११४५
तर, २१०० साली हे जग फार वेगळे असेल.
जे लोक - मी ज्याला पूर्वकाळचा पश्चिमखंड म्हणतो - तिथे
म्हणजे पश्चिम युरोप, उत्तर अमेरिका, इथले,
जगातल्या लोकसंख्येच्या प्रमाणात १०% हून कमी असतील.
८०% जागतीक संख्या अशियात आणि आफ्रीकेत नांदत असेल.
पण त्यांना टिकून राहण्यासाठी पुरेशी संसाधना असेल का?
पण, हे एक महान आव्हान असेल
आणि काही आपोआप येणार नाही.
पण माझ्यामते या अब्जावधी लोकांना गुण्यागोविंदाने एकत्र रहाता येईल.
जे पाहिजे ते ५ अब्ज लोकांचा एक संपन्न आणि शांत अशिया
हे पहायला मिळण्याचा संभाव नक्कीच आहे.
जपान, दक्षीण कोरीया आणि इतर अत्ताच संपन्न आहेत.
त्यांच्यामागोमाग ह्या संपन्नतेच्या रस्त्यावर, चीन, भारत आणि
इंडोनेशिया या देशांचे मोठाले भाग व इतर ानेक अशियाई देश आहेत.
याखेरीज, अशियातल्या गारिब देशात,
बर्याच जणांचे आयुष्यमान सुधारत आहे.
पण भवितव्यात, आफ्रीकेचे ४ अब्ज लोंकाचे काय होणार?
ते भयंकर दारिद्रयरेषेखाली राहतील का?
मी आफ्रीकेतील अत्यंत दारिद्र्य बघितले आहे.
३० वर्षांपूर्वी मी डॉक्टर म्हणून २ वर्षे खुप प्रकर्शाने माझे आयुष्य घालवले,
ते आफ्रिका खंडाच्या पूर्वकिनार्याच्या गरीब मोझांबिक देशात.
मोझांबिकला नुकतेच स्वतंत्र्य मिळले होते,
वसाहती-पोर्तुगाल विरुद्ध एक लांब युद्धानंतर.
माझे काम, आम्हा दोन परदेशीय डॉक्टरांपैकी एक म्हणून,
३ लाख लोकांकडे बघण्याचे होते.
आणि हे ते इस्पितळ होते. माझी पत्नी सुध्दा तिथे
प्रसुतीशास्त्रातील परिचारिकेचे काम करत असे.
या रुग्णालयातील हे सगळे कर्मचारी.
पांढर्या कोटातल्यांना कमीत कमी एक वर्ष एक व्यावसायिक प्रशिक्षणाची
(पोर्तुगीज) वसाहती काळात संधी मिळाली होती.
आणि इतर, - - - त्यांना वाचता किंवा लिहिता पण येत नसे.
पण ते सर्वजण अतिशय समर्पित आणि प्रेरणापुर्वक कार्य करत.
पण रुग्ण आलेते वाईट रोग अत्यंत गरीबी घेउन
आणि अमच्याकडील संसाधने कित्येकदा अपुरी पडत.
आणि विशेषत: तरुण डॉक्टर म्हणून माझे कौशल्य,
रुग्णांना गरजा पूर्ण करण्यासाठी कमी पडत असे.
मोझांबिक अजूनही अत्यंत गरीब देश आहे.
परंतू मी ३० वर्षांपूर्वी होतो त्यपासून गोष्टींमधे बरीच सुधारणा झाली आहे.
सांगायची सुरुवात म्हणजे, आता मी ज्या गावात ३० वर्षांपूर्वी
काम केले तेथे आता एक नवीन रुग्णालय आहे.
त्या नवीन आणि खूप मोठ्या रुग्णालयात १५ डॉक्टर आहेत
आणि त्यातले ११ जण स्थानीक मोझांबीकचेच आहेत.
सर्व कर्मचार्यांना व्यवस्थीत प्रशिक्षण मिळलेले आहे.
रुग्णालयाचे संचालक आहेत डॉ. काशिमो, प्रसुतीशास्त्रातील तज्ञ.
हे परिवर्तन मला आश्चर्यकारक वाटते!
ते नियमितपणे सिझेरियन प्रसुती मधून महीलांना वाचवतात,
जी गोष्ट मी जेव्हा तिथे होते तेव्हा अशक्य होती.
सगळ्या गोष्टी येवढ्या सुधारल्या आहेत.
आज मोझांबिक जन्मलेल्यांचे भविष्य खूपच उजळ असेल!
नुसते चांगले आरोग्यच नव्हे तर वेगाने सुधारणारी अर्थव्यवस्था सुध्दा!
(समुद्रकिनारची) व्यस्त बंदरे आणि बाजार
आणि नवे उद्योग बरेच नवीन रोजगार!
मला कल्पना आहे; तुम्ही विचार करत असालकी
ही चांगली बातमी फक्त शहर आणि गावांपुरतीच आहे.
आणि ते खरे आहे!
वाईट आव्हान ग्रामीण भागात आहे जेथे बहुतांशी लोक राहतात.
पण तिथे सुध्दा वस्तुस्थिती बदलत आहे.
मोझांबीकच्या खूप आतल्या ग्रामीण भागात आहे एक जिल्हा - मोगोव्होलास.
हे अॉलिव्हिया आणी आन्द्रे यांच्या तरूण कुटुंबाचे घर.
जगातील अनेक गरीब लोकांसारखे,
अॉलिव्हिया आणि आंद्रे हे देखील शेतकरीच आहेत.
त्यांचे खाणे हे ते काय पेरतील यावरच अवलंबीत आहे.
पहाटेचे ४ वाजले अहेत आणि दिवसाची सगळी कामे बोलावतायत.
आन्द्रे सरळ शेताकडे नीघतो.
अॉलिव्हिया प्रथम पाणी आणायाला जाते.
दोघांनाही कुठेही पोचायला अनेक मैल पायदळी जावे लागते.
कसल्याहि वाहतूकीचा पर्याय नसल्याने,
सर्व गोष्टी चालत जाऊनच आणाव्या लागतात.
अॉलिव्हिया आणि आन्द्रे यांना ८ मुले आहेत.
अजूनही ग्रामीण आफ्रिकेत जन्मसंख्येचा दर जास्तच आहे.
आणि सर्वात गरीब कुटुंबांना सर्वात जास्त तोंडे भरावी लागतात.
जे काही हे कुटुंब वाचवेल, त्याची ते विक्री करतील.
पण हळूहळू गावाखेड्याकडेसुध्दा आर्थिक वाढेला सुरुवात झाली आहे.
आता आन्द्रेची नजर एका अशा गोष्टिकडे लागली अाहे,
ज्याने त्याच्यामते सगळेच बदलून जाईल.
सायकलमुळे खेड्यातील गरीबांच्या
आयुष्यात खूपच फरक पडू शकतो.
ते अनेक तास वेळ वाचवू शकतात आणि
आजून जास्त कामे संपवू शकतात
सायकलच्यामुळे ते जास्त जडवस्तू बाजारात नेऊ शकतात.
आणि जास्त पैसे कमवू शकतात.
ते काम शोधण्यासाठी प्रवास करू शकतात.
आणि जर ते आजारी पडले तर
वेळच्यावेळी दवाखान्यात पोचू शकतात
आन्द्रे आणि अॉलिव्हिया गेले २ वर्ष पैसे बाजूला ठवत आहेत.
अजून त्यांच्याजवळ पुरेसे नाही आहेत.
आता सगळे त्यांनी पेरलेल्या तिळाच्या पिकावर अवलंबून आहे
जर त्यांना त्याची चांगली किंमत मिळाली
तर कादाचित त्यांचे बनुन जाईल
आन्द्रे आणि अॉलिव्हिया हे एका सर्वात गरीब देशात रहातात.
आणि ते ग्रामीण भागात रहातात जो देशातला सर्वात गरीब भाग आहे.
तेव्हा अशा तर्हेने रहाणारे जगात किती लोक आहेत?
आणि त्यातले किती आहेत जे गरीब आहेत?
आता मी तुम्हाला ही एक यार्डाची मोजपट्टी दाखवेन.
आगदी सोपे. गरीब - - -आणि - - -श्रीमंत
इथे पुन्हा माझ्याकडे अाहेत - ७ अब्ज.
त्यांची आगदी सोप्यापध्दतीने रचना केली आहे,
सर्वात गारीबापासून ते सर्वात श्रीमंता पर्यंत.
आता, हे इथले १ अब्ज श्रीमंत,
दर दिवसाला डॉलरच्या प्रमाणात, किती कमावतात?
आपण इथे पाहू
अो अो
तो वर येतोय, तो वर येतोय - -
अो अो
मी इथवर पोचूच शकत नाही. १०० डॉलर्स दिवसाला.
आता आपण बघू ह्या मधल्या अब्जांचे. ते किती कमावतात?
ते दिसेलच आता - - - फक्त १० डॉलर्स
आता मी सर्वात गरीब अब्जांच्याकडे जातो. ते किती कमावतात?
(बघू)
फक्त १ डॉलर.
आज हा या जगातला फरक आहे.
अर्थतज्ञ्यांनी एक रेषा काढली आहे अत्यंत गरीबीची.
जेमतेम १ डॉलरच्या वर.
तेव्हा तुम्हाला कुटुंबाला पुरेसे खाण्यापुरते अन्न देखील जेमतेम असते
आणि तुम्हाला खात्री देखील नसतेकी सगळ्या दिवशी पुरेसे अन्न असेल.
हे १ अब्ज अजुनही त्याखालीच आहेत.
हे दुसरे अब्ज त्या रेषेने दुभागले गेले आहेत.
आणि बाकी सर्व त्याच्यावर आहेत.
आगदी गरीब लोकांना जोडे घेणे देखील परवडणे अवघड होते.
आणि ते जेव्हा जोडे घेतात - - - त्यानंतर ते साठवणूक करतात ते सायकल साठी
आन्द्रे आणि अॉलिव्हिया ते सध्द्या या परिस्थितीत आहेत.
आणि सायकल नंतर, ते मोटारसायकलच्या मागे जातील.
आणि मग मोतारसायकलनंतर, ती कार (गाडी).
आणि माला आठवते आहे जेव्हा माझ्या कुटुंबाकडे गाडी आली,
ती होती छोटीशी राखाडी रंगाची व्होक्सवॅगन्.
आम्ही सर्वप्रथम काय केले तर नॉर्वेला सुट्टीला गेलो,
कारण नॉर्वे स्वीडन् पेक्षा जास्त सुरेख आहे.
तो एक विलक्षण (सुरेख) प्रवास होता!
आणि आता मी या गटात आहे. मी ह्या श्रीमंतासारखा जाऊ शकतो.
आम्ही सुट्टीसाठी विमानाने जाऊ शकतो.
अर्थात, या "वैमानिक" लोकांच्यापेक्षासुध्दा
अनेक लोक बरेच श्रीमंत आहेत.
काही लोक एवढे श्रीमंत आहेत की ते आता अंतराळात
पर्यटक म्हणून जावे असा विचार करू लागले आहेत.
आणि "वैमानीक" लोकांच्या आणि इथल्या
सर्वात श्रीमंत लोकांच्या कमाईतला फरक - -
हा "वैमानीक" लोकांच्या येवढाच मोठा आहे.
आगदी ह्या टोकाच्या सर्वात गरीबांच्या तुलनेचा.
आता या यार्डाच्या मोजपट्टीतून सर्वात
महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची म्हणजे ती ही.
ते दाखवण्यासाठी मला शिडीची गरज आहे.
कधीकधी तुम्हाला चांगले चालणार्या
जुन्या तंत्रज्ञानाची देखील गरज असते.
हे इथे
मी फक्त इथवर - - - बर इथे आहेत ते, आता मी वर पर्यंत पोचलोय.
आम्ही दिवसाला १०० डॉलर्स कमावणार्यांना
एक समस्या अशी आहे की आम्ही खाली बघतो
त्यांच्याकडे जे दिवसाला फक्त १० कींवा १ डॉलर कमावतात -
ते सगळे सारखेच गरीब दिसतात.
आम्हाला (त्यांच्यातला) फरकच दिसत नाही.
ते असे दिसते की ते सगळे एकसारख्याच मिळकतीवर रहातात.
आणि मग ते म्हणतात "ते सगळेच गरीब आहेत."
नाही, मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगूशकतो. कारण
मी त्या लोकांशी भेटलो, बोललो आहे जे तीथे राहतात.
आणि मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगूशकतो
की तिथल्या खालच्या लोकांना
ह्याची व्यवस्थीत कल्पना आहे की (त्यांचे) आयुष्य किती सुखाचे असेल जर ते १ डॉलर वरून १० डॉलर्सवर पोचलेतर.
१० पटीने जास्त कमाई.
हा खूप मोठा फरक आहे.
हे समजण्यासाठी, - - - अॉलिव्हिया आणि आन्द्रे
आता असे करायचा प्रयत्न करत आहेत.
ह्या रेषेतील प्रत्येक छोट्या पाऊलागणीक
जोड्यापासून ते सायकलकडे
दूरवरून ते कितीही छोटे दिसलेतरी
त्यांच्या आयुष्यात त्याने खूप फरक पडतो.
आणि आन्द्रे आणि अॉलिव्हियाजर सायकल घऊ शकलेतर
त्यांची प्रगती वेगाने चांगल्या आयुष्याकडे आणि धनसमृत्तीकड होईल.
आज, आन्द्रे आणि अॉलिव्हिया - अनेक महिन्यापासून
उगवलेल्या तिळाचे पीक विकायच्या तयारीस लागले आहेत
पण आन्द्रे आणि अॉलिव्हिया यांना योग्य भाव
मिळवण्यासाठी विशेष काळजि घ्यावी लागेल.
आन्द्रे विकण्याचे काम करणार आहे.
आणि तो आशेत आहे की अाता ही शेवटचीचवेळ असेल
जेव्हा त्याला वाताहतीसाठी दुसर्याची मदत घ्यावी लागेल.
आता आन्द्रेला आगदी काळजीपूर्वक लक्षदेऊन व्यवहार कारावा लागेल.
सौदा पक्का झालाय. मिळालेल्या किंमतीने आन्द्रे खुषित आहे.
ज्याक्षणासाठी कुटुंबाने कष्ट केले तो क्षण आलाय.
आन्द्रेचा सकाळभरचा बाजाराकडला प्रवास पायतळी होता.
आता, एका तासाच्या आत तो घरी पोहचू शकेल.
सायकलीचा कामाला ताबडतोब उपयोग केला जातोय.
मुले त्याने पाणी घेऊन येतात.
आन्द्रे बाजारात अजून जास्त पीक घेऊन जातो.
आणि तेवढेच महत्वाचे म्हणजे, आन्द्रे आणि अॉलिव्हिया
सहजगत्या प्रौढशिक्षणाच्या वर्गात पोहचू शकतात
जिथे ते चांगले गणीत अाणि वाचन लिखाण शिकू शकतात.
आन्द्रे आणि अॉलिव्हियांना सायकलवरून
गरीबीबाहेर पडताना बघणे हे किती महान दृष्य आहे.
आणि ते साक्षरतेच्या वर्गात जाताना सायकल घऊन जातात.
शिक्षण हे लोकांच्या आणि देशाच्या प्रगतिसाठी अतिशय मह्त्वाचे आहे.
पण कितींना कल्पना आहे जगात शिक्षणाचे काय झाले आहे?
पुन्हा महान ब्रिटिश अज्ञानाच्या सर्वेक्षणाची वेळ!
आता पहा
आम्ही विचारले, जगातले किती टक्के लोक
साक्षर आहेत, वाचू लिहू शकतात?
मी प्रेक्षकांना विचारू शकतो? कितींचा अंदाज आहे २० चा? हात वर.
४०?
६०?
आणि ८०?
हा ब्रिटिशांच्या उत्तरांचा नमुना आहे.
आता तुम्ही योग्य उत्तर काय आहे हे शोधण्यासाठी
ब्रिटिशांच्या सर्वेक्षणातील उत्तरांचा वापर करू शकता, नाही का?
अर्थात ८०% हे बरोबर उत्तर आहे.
निदान तुमचे सरासरीचे उत्तर ब्रिटिशांच्या
उत्तरापेक्षा नक्कीच् चांगले होते.
हो, आज, जगातील ८०% लोक वाचू आणि लिहू शकतात.
हो साक्षरता ८०% - - खरेतर, आगदी
नुकतेच आलेले अाकडे अजून मोठे आहेत.
तर, मी ह्या अकड्यांची तुलना
वानरांच्याशी केलीतर - - - तुम्हाला माहीतच् आहे. - - -
पुन्हा परत वानरांच्याकडून फक्त यादृच्छिक उत्तरांची अपेक्षा बाळगतो.
तरीदेखील तुम्हाला ३ पटीने जास्त बरोबर उत्तरे मिळतील
ब्रिटिशांच्या उत्तरांच्या प्रमाणात.
आणि आता विद्यापिठिय लोक - - -
कदाचित त्यांना माहीत असेल. - - - अरे, त्याहूनही वाईट.
हे काय - - ते काय शिकवत आहेत ब्रिटिश विद्यापिठातून?
जगाविषयीचे अंदाजहे कित्येक दशकाने मागे पडलेले आहेत.
(बातम्या देणारी) माध्यमे हे सांगायला पूर्णपणे विसरून गेले.
पण कदाचित ह्याचे कारण असेल की जग वेगात बदलते आहे.
(बंधू भगिनींनो) स्त्री-पुरुषांनो
मी माझा आत्तापर्यंतचा सर्वात आवडता आलेख दाखवणार आहे,
मी तुम्हाला २०० देशांचा गेल्या २०० वर्षातला
इतिहास १ मिनीटाच्या आत सांगणार आहे.
हा माझा कमाईचा अक्ष. आणि हा आयुष्यमानाचा.
मी सुरुवात करतो १८०० साली - आणि इथे हे सारे देश आहेत.
अाणि १८०० साली सगळे गरीबीच्या आणि
आजाराच्या कोन्यात होते; दिसते का तुम्हाला?
छोटे अयुष्यमान, कमी पैसे.
आणि इथे येतोए औद्योगिक क्रांतीचा परिणाम.
अर्थात, पश्चिम युरोपातील देशात चांगली समृद्धी आली
परंतू सुरुवातीस त्यांचे आरोग्य फारसे सुधारले नव्हते.
आणि ते वसाहतिच्या वर्चस्वाखाली होते,
त्यांना तेथे काही फायदा नव्हता.
ते तिथल्या गरीबीच्या दुसर्या कोपर्यात तसेच राहीले.
आणि इथे आरोग्य हळूहळू सुधारत आहे, ते तिथे वर सरकू
लागले आहेत जसे आपण नवीन शतकात येत आहोत तसे.
आणि प्रथम भयंकर महायुद्ध, आणि त्या नंतरची आर्थिक मंदी.
आणि मग दुसरे महायुद्ध.
अो आणि त्यानंतर स्वातंत्र्य.
आणि स्वातंत्र्यानंतर आरोग्य जलदपणे सुधारुलागले
आगदी इतर इथल्या देशांच्या तुलनेत सुध्दा.
आणि आता चीन आणि इतर लॅटिन अमेरिकन देशांची
जलदपणे आर्थिक समानतकडे वाटचाल सुरु झाली.
हे पहा ते इथे येत आहेत.
आणि भारत त्यांच्या मागोमाग आणि
आफ्रीकेतले देश देखील मागोमाग.
हा जगातील एक आश्चर्यकारक बदल घडला आहे.
येथे अमेरिका आणि ब्रिटन पुढे आहेत हे तुम्हाला माहीत आहे,
पण ते आता जलद हलत नाहीयेत.
जलद सरकणारे हे ते इथे मधे आहेत.
चीन अतिशय जलद वाटचाल करत आहे. आणि बांगलादेश ...
पहा बांगलादेश, येथे आधीच येऊन पोचलाय,
बराच निरोगी आणि आता जलद आर्थिक वाढीचा.
आणि मोझांबीक - - हो, मोझांबीक इथे मागे आहे,
पण ते सुध्दा वेगातच योग्य दिशेकडे सरकत आहेत.
पण मी जे दाखवतो आहे हे देशातील सरासरीचे अकडे.
पण लोकांचे काय? त्यांचे आयुष्य सुधारले आहे का?
मी आता तुम्हाला एक संख्याशास्त्रज्ञ म्हणून ज्याने
मी खूप उत्तेजित होतो ते दाखवणार आहे.
मी तुम्हास उत्पन्नाचे कसे वितरण आहे ते दाखवतो.
लोकातला फरक.
आणि त्यासाठी हे गोल मी ५० वर्ष मी मागे नेतोय.
आणि त्यानंतर आपण फक्त पैशाकडे लक्ष देऊ.
आणि त्यासाठी हल अक्ष विस्तृत आणि समायोजित करू,
कारण श्रीमंत खूप श्रीमंत आहेत आणि गरीब खूप गरीब आहेत
त्यामुळे त्यांच्यात (श्रीमंत व गरीबात)
देशोदेशामधल्यापेक्षा जास्त मोठा फरक असेल,
आता ह्यावर, आपण देशांना पडू देऊ. हा अमेरिका देश.
आणि यातला प्रसार त्या देशातली श्रेणी दाखवतौ.
आता मी अमेरिका खंडातले सगळे देश खाली आणतो.
आता तुम्हाला दिसेल सर्वात श्रीमंतापासून
ते गरीबातल्या गरीबापर्यंत.
आणि ही ऊंची दाखवते प्रत्येक कमाईच्या पातळीवर किती आहेत ते.
आणि आता यूरोपला पण खाली आणूयात.
आणि त्यावर मी आफ्रीका ठेवणार आहे
आणि शेवटी, जगातील सर्वात जास्त लोकसंख्येच्या
भागाचा, सगळ्यात वर, अशिया खंड.
आता १९६३ साली, जगात दोन मोठी
(उंटाच्या पाठीवरील) वाशिंड होती.
पहीले श्रीमंतांचे वाशिंड, ते हुबेहुब
मंगोलियन ऊंटाच्या पाठीवरल्यासारखे (दोन वाशिंडयाचे)! - - -आहे ना?
हे पहीले श्रीमंतांचे वाशिंड आहेते मुख्यतः युरोप अाणि अमेरिकेचे.
आणि हे इकडचे गरिबांचे वाशिंड ते अशिया व आफ्रीकेचे.
आणि "गरीब-रेखा" तिथे होती.
तुम्हाल दिसताहेत का ५० वर्षापूर्वी किती लोक अत्यंत गरीबीत होते?
आणि ते प्रामुख्याने अशीयात होते.
आणि लोक म्हणत की अशिया दारिद्र्यातून निघूच शकणार नाही;
जसे आज काही लोक आफ्रीकेबद्दल बोलतात तसे.
मग, काय घडले?
मी जग सुरु करतो.
आणि तुम्हाला दिसेल ब-याच लोकांचा जन्म दारिद्र्यात झाला,
पण अशीयाची चाल वाढत्या उत्पन्नाकडे गेली.
आणि १ अब्ज लोक अत्यंत गरीबीतून या दिशेने बाहेर पडले.
आणि सगळ्या जगाचा आकार बदलला,
आणि मंगोलीयन उंटाचा म्रुत्यु झाला.
आणि त्याचा अरेबियन (एकाच वाशिंद्म्हड्याचा) उंट
म्हणून पुनर्जन्म झाला.
आणि तुम्ही इथे काय पाहू शकता हे ते म्हणजे
हा श्रीमंतापासून तफावत होत असताना, जास्तीचे लोक हे मध्यावर
आणि जगातले खूपच कमी प्रमाणातले लोक
आता अत्यंत गरीबी खाली आहेत.
परंतू काळजी अजून असूद्या, तरीही खूप लोक आहेत;
१ अब्जाहूनही अधीक लोक अत्यंत गरीबी खाली आहेत.
आता प्रश्न असा की ही अत्यंत गरीबीतून
बाहेर येण्याचे असेच चालू राहील
विषेशतः (सध्याचे) आफ्रीकेतले आणि नवीन
अब्जावधी होणा-या आफ्रीकेतले?
मला वाटते कि हे शक्य आहे, आणि सांभाव्य पण आहे
की आफ्रीकेतले बरेच देश गरीबीतून वर येतील.
तो शहाण्यासारखी कृती आणि प्रचंड मोठी
गुंतवणूकीची आवश्यकता आहे, पण ते घडू शकते.
आफ्रीकेतले अनेक देश समान पातळीत सुधारत नाहीएत.
काही वेगात वाढताहेत, आणि काही संघर्षात अडकले आहेत.
परंतू बरेचसे, मोझांबीकसारखे, धीम्यागतीने प्रगती करत आहेत.
आणि ह्या सगळ्या नवीन आफ्रकेतील
लोकांना खायला कसे घालणार?
हो, आजकाल टंचाई आहे, पण अजून (सुधारणा) संभवनीय आहे.
आफ्रिकेतील कृषी उत्पादन, चांगल्या तंत्रज्ञानाने
जेवढे होऊ शकते त्यामानाने खूपच किरकोळ आहे.
आणि आफ्रिकेतील नद्यां कृषीसिंचनासाठी
जेमतेम उपयोगास वापरल्या आहेत.
एक दिवस आफ्रिकेत हारव्हेस्टर आणि ट्रॅक्टरच्या जोडीने
अनेक अब्जावधी लोकांना पुरेसे अन्न निर्माण करू शकतील.
आणि कृपया असे समजू नका की
आफ्रीका हे करू शकेल हे फक्त माझेच मत आहे म्हणून.
युनायटेड नेशन्स सध्या एक नवीन ध्येय ठरवत आहे -
२० वर्षाच्या आत अत्यंत गरीबी मिटवायचे
सगळे समजून आहेत की हे खूपच मोठे आव्हान आहे,
पण मला प्रामाणीकपणे वाटते की हे शक्य आहे.
कल्पना करा की जर असे घडले तर.
आता, काय आम्ही आतापर्यंत पाहिले आहे की श्रीमंतीचे टोक सरकते ...
आणि मध्यातले, ते ही सरकते,
पण गरीबीचे टोक मात्र अडकलेले
ह्या अत्यंत गरीबीतच आपल्याला जवळजवळ सर्व निरक्षरता सापडेल.
येथे आपल्याला मोठा बालमृत्यूचा दर आणि
दर स्त्रीला होणा-या अनेक मुलांचा जन्म दिसेल.
त्याचे असे वाटते की, जर पटकन् संपवली नाहीतर
अत्यंत गरीबी स्वतःचेच पुनरुत्पादन असे आहे.
पण आन्द्रे आणि अॉलिव्हिया, आणि त्यांच्यासारखे लोक,
त्यापासून दूर जाण्यासाठी खूपच मेहनत घेतात.
आणि त्यांना जर त्यांच्या सरकारकडून आणि
जगातील इतरांकडून योग्य मदत मिळेल,
विशेषतः शाळा, आरोग्य, लस, रस्ते,
वीज, गर्भनिरोधक सारख्या गोष्टींची,
तर त्यांना ते जमेल पण ते प्रामुख्याने त्यांच्या
स्वत: च्या मेहनतीनेच ते यशस्वी होतील.
बर, आपण निघू, आंद्रे आणि अॉलिव्हिया
यांच्या मागोमाग रेषा अोलांडून जा - - -
ते पुढील काही दशकातच हे शक्य आहे. - - - होयच!
पण गरीबीतून बाहेर पडणे ही फक्त सुरुवात आहे.
लोकांना या अोळीने चांगल्या आयुष्याकडे जाण्याची इच्छा आहे.
पण चांगल्या आयुष्याचा अर्थ काय?
जगातील बरेच लोक ज्या चांगल्या जीवनासाठी पराकाष्ठा करत आहेत
त्याचा अर्थ म्हणजे जास्त यंत्रे आणि जास्त ऊर्जा.
तर हा एक मोठा प्रश्न आहे. ह्या सगळ्याची बेरीज म्हणजे
भविष्याला एक मोठा धोका आहे - - - तीव्र हवामानतील बदल.
जगातील ८०% ऊर्जा अजूनही खनिज इंधनांतूनच येते,
आणि विज्ञानतून दिसत आहे की
भविष्यात हवामान नाट्यमय रितीने बदलू शकते,
परंतू कार्बन डायअॉक्साईडचे उत्सर्जन हे खनिज इंधन जाळल्यानेच होते.
मी हवामान बदल किती वाईट असेल हे सांगण्यासाठी योग्य व्यक्ती नाही,
ना ते कसे थोपवावे हे सांगण्यासाठी.
मी तुम्हाला आकडेवारीने तुम्हाला दर्शवून देऊ शकतो की
हे कार्बन डायऑक्साइड चे उत्सर्जन कोण करत आहे.
मी हे दाखवेन
तुम्हाला आठवती आहे ती यार्डाची पट्टी
सर्वात गरीब अब्जापासून ते सर्वात श्रीमंत अब्जापर्यंतची
आगदी ज्यांना जोडे जेमतेम परवडतात
त्यापसून ते जे विमानाने उड्डाण करू शकतात
आता हे दाखवते एका वर्षात सगळ्या जगाने वापरलेल खनिज इंधन.
कोळसा, तेल आणि नैसर्गिक वायू.
आणि ते दर्शवते कमी जास्त प्रमाणातले कार्बन डायऑक्साइडचे एकूण उत्सर्जन.
आता ह्यातले सर्वात श्रीमंत अब्जानी किती वापरले?
त्यातले निम्मे.
आता त्या खालील श्रीमंत अब्ज.
उरलेल्यातले निम्मे.
आणि तुम्हाला समजले असेल ते तिस-या अब्जातले किती वापरतात याचा.
उरलेल्यातले निम्मे. आणि बाकी फारच थोडा वापर करतात.
हे साधारण ढोबळ अकडे आहेत, पण ते व्यवस्थीत रित्या दाखवतात की जवळ जवळ
सगळे खनिज इंधन हे सर्वात श्रीमंत १, २ ३, अब्जांनी वापरले आहे.
८५% पेक्षा अधीक ते वापरतात.
आता श्रीमंत अब्जांची वाढ तरी थांबली आहे,
पण अाम्हाला अजून दिसायचे आहे कि ते कमी होईल का.
आणि येत्या दशकातील या दोन घटांची आर्थीक वाढ
ज्याकारणास्तव खनिज इंधनाच्या वापराचे व
कार्बन डायअॉक्साईडच्या उत्सर्जनाचे प्रमाण वाढेल.
याईथले अत्यंत गरीबी बाहेर येऊन आगदी मोटारसायकलिपर्यंत श्रीमंत झाले तरी
त्याचा कार्बन डायऑक्साइडच्या उत्सर्जनाला फारसा हातभार लागत नाही.
आणी जनसंख्यावाढीविषयी म्हणालतर पुढच्या ४० वर्षातले
अजून येणारे अनेक अब्ज, ह्या भागात असतील.
तरीसुध्दा, जर तुम्ही या टोकाच्या श्रीमंताना विचारले
तर वाटते कि त्यांना चुकीचेच कळलेले असावे.
ते त्यांच्या खूप जास्त वरच्या उत्सर्जनाच्या पातळीवरून
जगाकडे बघतात आणि म्हणतात - -
अहो, ते तिथल्या सगळ्यांनो, तुम्ही आमच्यासारखे
राहू शकणार नाही, तुम्ही (पृथ्वी)ग्रह नष्ट कराल.
हे पहा, मला ह्या लोकांचा, जे पुढे येवू बघताहेत त्यांचा,
युक्तिवाद योग्य वाटतो.
ते म्हणतात - "हं, तुम्ही कोण आम्हाला सांगणार कि
आम्ही तुमच्यासारखे राहू शकणार नाही?"
"आपण चांगला बदल करा जर आम्ही वेगळ्या पध्दतीने करावे असे इच्छित असल्यास."
जर ह्या अब्जावधींना चांगले जीवन हवे असेल तर -
त्यांना ज्या अद्याप ह्या मिळाल्या नाहीत - अशा अनेक आवश्यक गोष्टींची गरज आहे .
आंद्रे आणि त्याच्यासारखे अनेकांचे खेडे आणि घर इथे विजेचा पुरवठा देखील नाहीए.
मोझांबीकमधे कोळश्याचा खूप साठा आहे
आणि जर त्यांनी आणि इतर गरीब देशांनी नवीन परवडतील अशी कोळश्यावर आधारित असलेली वीज नर्मिती केंद्रे उभी केली तर
माझ्यामते, जे जास्त कार्बन (दायअॉक्साईड)चे उत्सर्जन करतात
त्यांनी त्यात ढवळाढवळ करू नये.
आता मी तुम्हाला दोन प्रश्न विचारणार आहे जे
मी नेहमी माझ्या स्वीडीश विद्यार्थ्यांना विचारतो.
पहिला आहे - आपल्यापैकी किती लोकांनी विमानाने प्रवास केला नाही?
अरे, अरे.
बरेच लोक विमान प्रवासाखेरीज राहू शकतात.
तर पुढचा प्रश्न असा - -
तुमच्यापैकी कितीजण कपडे धुण्याच्या यंत्रापासून लांब राहीले आहेत
आणि हाताने सागळे पलंगपोस
आणि कपडे स्वच्छ केले या गेल्या वर्षात?
मला वाटलेच. कुणिच नाही.
प्रत्येकजण ज्याला कपडे धुण्याचे यंत्र परवडते तो ते वापरतो
आगदी पर्यावरणासाठी जोरदार चळवळी करणारा सुध्दा!
आणी मला अजून आठवतोय तो दिवस जेव्हा
माझ्या कुटुंबात कपडे धुण्याचे यंत्र आले.
तो दिवस होता १ नोव्हेंबर १९५२
आज्जीला आमंत्रीत केले होते पहिल्या वापरासाठी
तिने आयुष्यभर हाताने कपडे धुतले होते९ जणांच्या कुटुंबाचे
आणि तिने जेव्हा यंत्रात कपडे भरले तेव्हा ती
एका तिवईवर बसून एक तास ते यंत्र संपेपर्यंत बघत राहीली.
ती पूर्णपणे मंत्रमुग्ध झाली होती.
त्यामुळे माझ्या आईला खूप मुक्त वेळ मिळाला
ज्यात तिला इतर गोष्टी करता आल्या.
तिला मला पुस्तके वाचून दाखवणे शक्य झाले,
मला वाटते की त्यामुळेच मी प्राध्यापक झालो.
मग आम्ही उगाच नाही पोलाद कारखान्याचे आभार मानत,
साबणाच्या कारखान्याचे आभार, वीज निर्माणकेंद्राचे आभार.
आता
ह्या सगळ्यातून आपण कुठवर येउन राहीलो तर
त्याबद्दल माझा तुम्हाला एक नम्र सल्ला आहे
इतर सगळ्या गोष्टीखेरीज - अकडेवारीकडे (आणि माहीतीकडे) बघा.
जगातल्या तथ्यतेकडे पहा.
मग तुम्हाला दीसेल की आज आपण कुठे आहोत आणि ह्यापुढे ह्या
अब्जावधी लोकांबरोबर आपण या सुरेख नक्षत्रावर पुढे कशी वाटचाल करू
अत्यंत गरीबीची आव्हाने मोठ्या प्रमाणाने कमी झाली आहेत
आणि इतिहासात प्रथमच ती कायमतः समाप्त करण्याची शक्ती आमच्यात आहे.
लोकसंख्या वाढीचे आव्हान खरं तर, आत्ताच सुटत आहे,
मुलांची संख्या वाढण्याचे थांबले आहे.
आणि हवामान बदलाविषयी म्हणालतरं, आपण
अजूनही सर्वात वाईट होउशकतील अश्या घटना टाळू शकतो.
पण त्यासाठी श्रीमंतांनी लवकरात लवकर
मार्ग शोधला पाहिजे ज्यामुळे त्यांची उर्जा आणि इतर संसाधने वापरायची पातळी हळूहळू
१० त ११ अब्ज लोकांबरोबर वाटून घेता येइल.
मी स्वतःला कधिच आशावादी म्हटलेले नाही
पण मी म्हणतो की मी "शक्यतावादी" आहे.
आणि मी असेही म्हणतो कि हे जग तुम्हाला वाटते त्यापेक्षा खूप चांगले आहे.
तुम्हाला खूप खूप धन्यवाद!